बुधवार, ९ एप्रिल, २०१४

 मोदी पंतप्रधान झाल्यास देशात मिनी आणीबाणी  

गुजराती लेखक, अर्थशास्त्रज्ञ, पत्रकार हेमंत शाह

गुजरातमध्ये विरोधकांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप

प्रतिनिधी । मुंबई
गुजरातमध्ये मोदी विरोधकांना बोलूच दिले जात नाही. लेखक, पत्रकारांना धमकावले जात आहे. गुजरात सरकार आणि कॉर्पोरेट्सनी विकासाच्या नावाखाली हैदास घातला आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास देशात आणीबाणीसदृश परिस्थिती उद्भवेल, असा गंभीर इशारा गुजराती लेखक, अर्थशास्त्रज्ञ, पत्रकार हेमंत शाह यांनी मंगळवारी दिला.
सर्वोदय मंडळाच्या वतीने गुजरातच्या विकास मॉडेलवर चर्चा आयोजित केली होती. त्यामध्ये शहा बोलत होते. नरेंद्र मोदींविरोधात गुजरातमध्ये बोलणारे बरेच आहेत. मात्र, त्यांना बोलू दिले जात नाही. धमकावले जाते, माध्यमे विकली गेली आहेत. त्यामुळे गुजरातच्या विकासाचे खोटे चित्र देशासमोर येत असल्याचे हेमंत शहा यांनी स्पष्ट केले. शहा म्हणाले, गुजरातमध्ये केवळ राज्य महामार्ग चांगले आहेत.
तालुका आणि गावरस्त्यांची दुरवस्था आहे. घरगुती वीज 24 तास आहे. मात्र, शेतकर्‍यांना रात्री-अपरात्री वीज दिली जाते. आज गुजरातेत सर्वत्र कार्पोरेट्स आणि सत्ताधारी यांनी हातमिळवणी केली आहे. मात्र, गुजरातमध्ये राज्य शासन आणि उद्योगपतींनी जितका नंगा नाच चालवला आहे, तितका जगाच्या इतिहासात कुठेही झाला नसेल, असा आरोप त्यांनी केला. 

कुपोषणामध्ये गुजरातचा 13 वा क्रमांक असून 44} नवजात अर्भके कुपोषित जन्मास येतात. दहा वर्षांत महिलांचा जननदर घसरला असून गुजरात राज्य शिक्षण आणि आरोग्यावर केवळ 1.9} इतका अल्प खर्च करते, असेही शहा म्हणाले.
 (दिव्य मराठीच्या दिनांक ०९/०४/२०१४ च्या अंकातील पृष्ठ ३ वरील बातमी )

 

 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा