रविवार, २५ मे, २०१४

शपथविधीपूर्वीच पाक/ अतिरेक्यांची सलामी

२६ मे रोजी पंतप्रधांनांचा शपथविधी होणार आहे. त्यापूर्वी निवडणूक निकालानंतर पुढील घटना घडल्या.
१) पाक सैन्याच्या बॉर्डर अक्शन टीमने एका भारतीय जवानाला ठार व दोघांना जखमी केले.
२) पाक सैन्याने सरहद्दीवर भारतीय सैन्याद्वारा केले जाणारे रस्त्याचे काम बंद पाडले.
३) अतिरेक्यांनी अफगाणिस्तानमधील हेरत येथील भारतीय दुतावासावर हल्ला केला. ही चकमक तब्बल नऊ
     तास चालली.
४) अमेरिकेच्या राजीनामा दिलेल्या राजदूत श्रीमती पॉवेल जून पर्यंत भारतात थांबणार होत्या. परंतु मोदींच्या
     शपथविधीच्या आधीच त्या २२ मे ला अमेरिकेला निघून गेल्या
वरील सर्व घटना लक्षात घेता मोदीनची पुढील वाटचाल सुरळीत होईल असे वाटत नाही. नवाज शरीफ यांच्यासहित सार्क देशांच्या  प्रमुखांना आमंत्रण गेले तेंव्हा इतर सर्व राष्ट्रप्रमुखांनी ताबडतोब आपला होकार कळवला. मात्र शरीफांना आपल्या लष्कर प्रमुखांच्या परवानगी घ्यावी लागली. ( ही पाकिस्तानची लोकशाही ) त्यासाठी त्यांना चार दिवस थांबावे लागले. आणि परवानगी मिळावी म्हणून नवाज शरीफ यांचे धाकटे बंधू, पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री, शाहबाज शरीफ यांना पाक लष्कर प्रमुखाकडे रदबदली करावी लागली. तेंव्हा कुठे परवानगी मिळाली. अशा या नामधारी पंतप्रधानांना शपथविधी समारंभाला बोलावून कुठली मुत्सद्देगिरी दाखविण्यात आली.
अर्थात भारतातील सर्वच विचारवंत पाकिस्तानच्या मुलकी सरकारशी बोलणी सुरु ठेवली पाहिजेत या मताची आहेत. त्याला अनुसरून युपीए सरकार वागत होते. मात्र भाजप तेंव्हा तत्कालीन सरकार नेभळट आहे असा कांगावा करत होते. व निवडून आल्यावर मात्र त्यांची भाषा बदलली. म्हणजे तुम्ही कराल तर भेकडपणा आणि  आम्ही करू तो मुत्सद्दीपणा असे भाजपचे आचरण आहे. या पार्श्वभूमीवर नवाज शरीफ यांच्या शपथविधींचे आमंत्रण अव्हेरून मनमोहनसिंगांनी आपला कणखरपणा दाखवून दिला होता व एका आंतरराष्ट्रीय बैठकीत बैठक संपल्यावर पाकिस्तानच्या राष्ट्र प्रमुखांकडे ढुंकूनही न पाहण्याचे धारिष्ट्य सुद्धा सरदारजींनी दाखविले होते. तशी हिम्मत मात्र स्वतःला कट्टर राष्ट्रवादी म्हणवून घेणारे भाजप व शिवसेना यापुढील भविष्यात दाखवू शकतील असे वाटत नाही.
या सर्व गदारोळात आणखी एका गोष्टींची भर पडली आहे ती म्हणजे ज्या चार सैनिकांची डोकी पाक सैन्याने मागील वर्षी कापून नेली होती त्यापैकी एक शहीद स्व. हेमराज यांच्या विधवा पत्नीने भारतात येतांना माझ्या
पतीचे शीर घेऊन या अशी मागणी केली आहे. एकूणच " शहिदोकी विधवाये माफ नही करेगी " या वाक्याचा सामना नमोंना जळी, स्थळी,  काष्ठी, पाषाणी, यत्र, तत्र सर्वत्र करावा लागणार असे दिसते. सध्यातरी पाक सरकार व अतिरेक्यांनी नमोंना शपथाविधीपुर्वीच सलामी दिली आहे.
राजेंद्र कडू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा