शुक्रवार, ९ मे, २०१४

तिसरे महायुध्द 

अभ्यासकांच्या मते पहिल्या दोन्ही महायुद्धाला कारणीभूत असलेल्या अनेक कारणापैकी एक प्रमुख कारण म्हणजे युरोप मधील काही देशांचा अतिरेकी राष्ट्रवाद. आता हा बहुमान भारताकडे येईल काय ? चिन्हे तशीच दिसत आहेत. दुसरे एक कारण म्हणजे विस्तारवाद. आता ही  भूमिका चीन कडे आली आहे. चीनने  शेजारील एकाही देशाशी कुरापत काढण्याचे सोडले नाही. जापान तर चीनला शत्रू क्रमांक एक मानते. नुकतेच बराक ओबामा जापानच्या दौऱ्यावर होते. त्यामुळे चीनला योग्य तो संदेश गेला आहे. कालच चीनने व्हिएतनामशीही कुरापत  काढली आहे. अन्य लहान लहान देशांनाही चीन धमकावत आहे. चीनच्या या विस्तारवादी भूमिकेमुळे व भारतातील काही अतिरेकी राष्ट्रावादी मंडलीमुळे तिसरे महायुध्द ( झालेच तर ) आशियाच्या भूमीवर होईल काय ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा