सोमवार, २ जून, २०१४

 एका आर्किटेक्ट तरुणीवर गुजरात पोलिसांनी पाळत ठेवली होती व कर्नाटक पोलिसांनाही लक्ष ठेवण्यास सांगितले होते. या प्रकरणाची न्यायिक चौकशी करण्याचेही यापूर्वीच्या सरकारने ठरविले होते व चौकशी आयोगाची स्थापनाही करण्याची सरकारने ठरविले होते. मात्र लगेच होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन हा आयोग स्थापन करण्याचा निर्णय नवीन सरकारवर सोडला होता. मात्र नवीन सरकारची या बाबतीत काही हालचाल दिसत नाही.
त्या तरुणीच्या वडिलांनी चौकशी करू नका अशी विनंती केल्याचे समजते. व त्या तरुणीचे अख्खे कुटुंब देश सोडून गेल्याचे समजते. खरे काय ते बाहेर यायला पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा