रविवार, १३ जुलै, २०१४

प्रत्येक फ़ाइल मंत्री/मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलीच पाहिजे काय ? मग आमचे जिल्हाधिकारी, आयुक्त, उपसचिव, सहसचिव, अतिरिक्त सचिव ,प्रधान सचिव,मुख्य सचिव कशाकरिता आहेत. असे म्हणतात की सनदी अधिकारी (म्हणजेच आयएएस अधिकारी) म्हणजे हुशार, तडफदार, कुशाग्र बुद्धीचे , धडाडीचे, झटपट निर्णय घेणारे, विषय ताबडतोब समजून घेणारे असतात. सनदी अधिकाऱ्यानचे हे वर्णन मी बऱ्याच  IAS या शब्दाने भाराऊन जाणाऱ्या लोकांकडून ऐकले आहे. परंतु मग मंत्र्यांकडे इतक्या फाईली कशा तुम्बतात. ही सर्व  IAS मंडळी आपली जबाबदारी वरवर  ढकलत नेतात कि काय ? मि अजून पर्यंत सनदी अधिकारी कसा असतो ते प्रत्यक्ष पाहिला नाही. परंतु हे तुंबलेल्या फाइलीन्चे किस्से ऐकून माझे सनदी अधिकाऱ्यान्बद्दल फारसे अनुकूल मत बनले नाही. इथे प्रशासनाच्या विकेंद्रीकरणाचाच गळा घोटला जातोय असे मला वाटते. तुमचे काय मत आहे ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा