शनिवार, ३० ऑगस्ट, २०१४



   " निवडणुका तोंडावर आयोग आयुक्ताविना " अशा शीर्षकाची बातमी एका नामांकित वृत्तपत्राने प्रसिद्ध केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की विधान सभेच्या निवडणुका जवळ आल्या तरी महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे आयुक्तपद रिकामे आहे व मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी  गलथानपणा दाखविला आहे. या विद्वान पत्रकारांना हे माहित नाही की लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्र निवडणूक आयोग घेत नाही तर भारत निर्वाचन आयोग घेतो. महाराष्ट्र निवडणूक आयोग महाराष्टातील महापालिका, नगरपरिषदा व ग्रामपंचायतीनच्याच निवडणुका घेतो. भारत निर्वाचन आयोग व महाराष्ट्र निवडणूक आयोग यांचा परस्पर काहीही संबंध नाही. भारत निर्वाचन आयोग हा घटनेतील तरतुदीनुसार स्थापन झाला असून महाराष्ट्र निवडणूक आयोग हा महाराष्ट्र विधानसभेने कायदा करून अस्तित्वात आला आहे. भारत निर्वाचन आयोगाचा महाराष्ट्रात मुख्य निवडणूक अधिकारी असा अधिकारी आहे. व तो लोकसभा व विधानसभा यांच्या निवडणुकांशी संबधित सर्व काम पाहतो.महाराष्ट्र निवडणूक आयोग त्यात ढवळाढवळ करू शकत नाही. हा मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र निवडणूक आयोगाचा कर्मचारी नाही.कृपया बातमी लिहिण्यापूर्वी पत्रकारांनी होमवर्क करावे व वाचकांची दिशाभूल करू नये. पृथ्वीराज चव्हाण यांना झोडपण्याकरिता दुसरे कारण शोधावे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा