अवघा मराठी मुलुख एक रहावा. स्कॉटलंडने ब्रिटनची फाळणी फेटाळून लावली. तेलंगणा वेगळा झाल्यावर आंध्रच्या लोकांना वाईट वाटले व ह्या विभाजनाविरुद्ध मोठे आंदोलन झाले.ते आंदोलन पाहून विदर्भवादीही स्तब्ध झाले होते. वेगळ्या विदर्भाबाबतही तसेच होईल काय ? त्यापेक्षा वाकुडकर सरांची मिनी मंत्रालय योजना काय वाईट आहे. विदर्भातील नेत्यांमुळे विदर्भ मागास राहिला. पण वेगळा विदर्भ झाल्यावर हीच मंडळी सत्तेवर येणार हे नक्की. मग यांच्या नेतृत्वाखाली विदर्भ पुन्हा मागास राहणार नाही काय ? त्यापेक्षा संयुक्त कुटुंबात राहिलेले काय वाईट ? युरोप मध्ये दोन डझन देश एकत्र येउन त्यांनी युरोपिअन महासंघ स्थापन केला आणि चलन एकच ठेवले,युरो. त्यातील इंग्रजी बोलणारे मोजकेच देश आहेत. आणि आता ते एक राज्यघटना तयार करण्याचा विचार करत आहेत. सध्या सयुंक्त महाराष्ट्र असुनही दिल्लीश्वर आपल्याकडे नावडतीचे पोर म्हणून पाहतात. वेगळे झालो तर आपले हाल कुत्राही खाणार नाही. अवघा मराठी मुलुख एक रहावा. United we stand , divided we fall
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा