अशी परिस्थिती येईल हे गाडगेबाबांनाही माहित नव्हते. त्यांनी काहीही करून आपल्या मुलांना शिकवा असा उपदेश केला होता. नुसते शिकून काही होत नाही. शिकल्यावर नोकरी मिळवावी लागते, तिही सरकारी आणि तीही कसेही करून. म्हणजे वशिला, पैसे मोजून किंवा अन्य काही तरी करून. आणि जेवढे " शिकतात " त्यापेक्षा नोकऱ्यांची संख्या अगदी नगण्य आहे. म्हणजे नोकरी मिळवण्यात गळेकापू स्पर्धा आहे . शिक्षणाने जीवन सुखी झाले असते तर कोट्यावधी लोक सुखी झाले असते. ती संख्या काही लाखात सुद्धा नसेल. उलट जे शिकले नाहीत ते शेतात किंवा अन्यत्र श्रमाची कामे करून मजेत जगताहेत. शिकणारयांना श्रमाची कामे करायला लाज वाटते. ग्रामीण भागात शेतमालकापेक्षा मजूर मजेत आहे. फक्त काहीच लोक वतनदाराचे वेतनदार झाले. पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाचे लाभार्थी सुद्धा पैशाची उधळपट्टी करतात. मग त्यांची अवस्था का वाईट झाली नाही ? काही मुठभर लोकांनाच " कमाईची" साधने गवसतात. व ९५ टक्के त्यापासून वंचित राहतात. याचा शिक्षणाशी काहीही संबंध नाही. पोटाला चिमटा घेऊन मुलांना शिकवले जाते, त्याचा काहीही फायदा होत नाही. अशी परिस्थिती येईल हे गाडगेबाबांनाही माहित नव्हते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा