सोमवार, ५ जानेवारी, २०१५

बाजारसमित्या म्हणजे शेतकरयांना व्यापार्यांच्या तावडीत आणून देणारे कत्तलखाने झाले आहेत. बाजारसमित्या ताबडतोब बरखास्त करा. केवळ कार्यकर्त्यांची वर्णी लावण्याकरिता समित्यांचा वापर होत आहे. जिथे पिकते तेथूनच खरेदी करा, असा कायदा तातडीने होण्याची गरज आहे. आमच्या आजोबांच्या वेळेस बाजारसमित्या नव्हत्या तेंव्हा " उत्तम शेती , मध्यम व्यापार " अशी स्थिती होती. आता उलट झाले आहे. अपनी गलीमे कुत्ता शेर होता है या म्हणीप्रमाणे यार्डात निरनिराळी कुत्री बळीराजारुपी वाघाची लचकी तोडत असतात. त्यांना आता आपल्या गल्लीत ( गावात) येऊ दे. बाजार समित्या ताबडतोब बरखास्त करा. हेच शेतकऱ्याच्या सर्व समस्यांवर जालीम औषध आहे. सरकार बाजारसमित्या रद्द करत नसेल तर किमान आम्हाला बाजारसमित्यांवर बहिष्कार तरी टाकता येईल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा