सोमवार, १५ जून, २०१५

 पर्रीकरजी, पोरकट पणा सोडून द्या. 


अमिताभ बच्चनच्या देमार चित्रपटासारखे पाकिस्तानला धमकावू नका. तुम्ही काही वाघा बोर्डर वर पाच फुट पाय उंचावून त्वेषाने खाडकन जमिनीवर पाय आपटणारे जवान नाही आहात. तेथे भारत आणि पाकिस्तानचे सैनिक समोरासमोर असतात. तेथे भारतीय जवानांनी दाखवलेला त्वेष शोभून दिसतो. भारतीय प्रेक्षकही मोठ्या संख्येने हजर असतो. त्यांचेही मनोधैर्य उंचावते. तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री आहात. दहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात धडा आहे. त्यात असे म्हटले आहे की यापूर्वीची दोन्ही महायुद्धे अतिरेकी राष्ट्रवादामुळे झालीत. दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या अतिरेकी राष्ट्रवादामुळे फक्त जर्मनीची नव्हे तर बर्लिन शहराचीसुद्धा दोन शकले झाली होती. आर्य वंश श्रेष्ठ आहे व ज्यू अन्य जन हे 'काफिर' आहेत या एकमेव दुराग्रहामुळे हे सर्व  घडून आले. कृपया तुम्ही ती चूक करू नका. दहावीच्या विद्यार्थ्यांना जे आम्ही शिकवतो ते आम्ही मोठ्यांनी आत्मसात करायला हरकत आहे. पाकिस्तानला कोरड्या धमक्या देण्यापेक्षा  'लढके लिया बांगला देश, हंसके लेंगे पाकिस्तान'  ही घोषणा चालेल. नाही तरी पाकिस्तानी जनता तेथील आतापर्यंतची सरकारे, तेथील मुल्ला-मौलवी, मुलतत्ववादी, तालिबानी, तेथील लष्कराचा नागरी प्रशासनातील हस्तक्षेप व अतिरेक्यांना अभय या सर्व गोष्ष्टीना कंटाळली आहे. भारताने जर आपल्या सीमा खुल्या केल्या तर मला खात्री आहे की पाकिस्तानातील सर्व जनता भारतात येईल व पाकिस्तानात काळे कुत्रे सुद्धा राहणार नाही.  यापूर्वी ७१  इदिराजींनी कुठल्याही वल्गना न करता पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते तर. वल्गना करणारा हिटलरला मात्र आत्मघात करून घ्यावा लागला होता. त्यापेक्षा काश्मिरात रोज पाकिस्तानचे झेंडे फडकताहेत तिकडे लक्ष द्या. काल तर वाचले की काश्मिरात ISIS चे झेंडेसुद्धा फडकले. त्यामुळे मोदींच्या ५६ इंची छातीचे हसे होत आहे. हसे होत आहे व हीच काय ती चौकीदारी ? असे लोक विचारताहेत. कृपया "बच्चनगिरी" थांबवा व थोडे  इंदिरा 'गांधी गिरी' चे धडे घ्या. आणि हो तो दहावीचा धडा विसरू नका. जे इतिहास विसरतात त्यांचे भविष्य अंधकारमय असते असे म्हणतात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा