शुक्रवार, ८ जानेवारी, २०१६

समाजात माध्यम साक्षरता निर्माण करणे आवश्यक

-डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी
सकाळीउठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काय खावे, काय प्यावे, कोणती वस्तू वापरावी हे सर्व माध्यमे ठरवितात.जाहिरातदारांना ग्राहक विकणे हा माध्यमांचा सर्वात मोठा उद्योग झाला आहे, त्यामुळे या माध्यम जगताला प्रश्न विचारण्यासाठी समाजात माध्यम साक्षरता निर्माण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन साहित्यिक माध्यमतज्ज्ञ डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले. श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या पत्रकारिता जनसंवाद विभागाच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित पत्रकार दिन 'संवादक' प्रकाशन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

पत्रकारितेचे आदर्श ज्यांनी निर्माण केले त्यांचे स्मरण करण्यासाठी आपण पत्रकार दिन साजरा करतो. त्यांची पत्रकारिता समाज बांधणीच्या कामासाठी होती. ती समाजाचा आरसा होती. त्या आरश्यात समाजाचे प्रतिबिंब उमटायचे. आज या दर्पणात मात्र समाजाचे प्रतिबिंब दिसण्याऐवजी ती संपूर्णपणे प्रायोजित झाल्याची खंत करून आज जगात सर्वत्र 'राजकीय संवाद' हा इतर संवाद प्रकारांवर वरचढ झाला असून राजकारणीसुद्धा जाहिरातींचे ब्रान्डीग करू लागलेत,याकडे डॉ. जोशी यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

'रोबोटिकजर्नालिझम' चा आधुिनक जगात झाला प्रवेश
चीनमध्येएका रोबोटने तीन लाख लेख तयार केले. पत्रकारितेतील जिवंत माणसे यंत्र झाली असताना आता जगात 'रोबोटिक जर्नालिझम' चा प्रवेश झाला आहे. उद्या हे रोबोट यंत्र मानवी यंत्राची जागा घेतील आणि माध्यम सम्राटांना जे पाहिजे ते लिहून देतील. आतापर्यंतचे युद्ध हे माहितीचं युद्ध होतं आता यापुढे आशयाचं युद्ध राहील, याकडे डॉ. जोशी यांनी लक्ष वेधले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा