रविवार, १० एप्रिल, २०१६

आधीच्याच सरकारच्या योजना पुन्हा जाहीर करा आणि ………

स्वत:चीच पाठ थोपटवून घ्या. उदा. आधी जलयुक्त शिवार. आणि आता ब्रिज कम बंधारा.
या योजनेची सुरुवात काही वर्षांपूर्वीच सुरु झाली आहे आणि आता देवेंद्र सरकार ती नवीन योजना म्हणून जाहीर करत आहे. या योजने खाली असा एक पूल काम बंधारा अमरावती जिल्ह्यात वर्धा नदीवर दहा बारा वर्षांपूर्वीच बांधल्या गेला आहे. त्यामुळे पुलाला लागून असलेले व पौराणिक महात्म्य असलेले तीर्थक्षेत्र, कौन्डण्यपूर (जेथे दर्शनासाठी आलेल्या रुक्मिणीचे तिच्याच संमतीने अपहरण करून भगवान श्रीकृष्णाने अमरावती येथील अम्बादेवीच्या मंदिरात विवाह केला होता), येथे वर्षभर जलसाठा असतो. आणि या पुलामुळे अमरावती व वर्धा या दोन शहरातील अंतर ही कमी झाले. वर्धा नदी ही अमरावती व वर्धा जिल्ह्यांच्या सीमा विभाजित करते.
या उधारीच्या योजनांवर किती दिवस कारभार करणार देवेंद्र जी ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा