पहिल्या सहा मजल्यावरच सातवा मजला उभा राहू शकतो ……
जवाहर रचिला पाया, मनमोहन झालासे कळस, भारताने वैज्ञानिक क्षेत्रात प्रगती करावी म्हणून पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, पटेल व अन्य जाणत्या नेत्यांनी निरनिराळ्या संशोधन संस्था स्थापन केल्या या संस्थाना नेतृव देऊ शकतील अशा व्यक्तींचा शोध घेऊन (उदा. विक्रम साराभाई वगैरे) संशोधनाची धुरा त्यांच्या हातात दिली. पुढे शास्त्रीजी, इंदिराजी, नरसिंहराव, वाजपेयीजी व परवापर्यंत पंतप्रधान असलेले मनमोहन सिंग यांनी आपापल्या परीने त्यात भर घालून देशाला वैज्ञानिक व तंत्रज्ञानदृष्ट्या समर्थ केले. यातील शिरपेच म्हणजे काल श्रीहरीकोटा येथून स्वदेशी बनावटीच्या नेव्हिगेशन उपग्रहाने अवकाशात झेप घेतली. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक वाहनाने झेपावलेला हा भारताचा उपग्रह या
मालिकेतील सातवा आणि शेवटचा नेव्हिगेशन उपग्रह आहे. बारा वर्षे तो सुरळीत चालू शकेल. अशी कामगिरी करायची म्हणजे दूरदृष्टी ठेवून केलेले नियोजन आणि कामगिरीतील सातत्य याची आवश्यकता असते. व असे हे नियोजनकार उथळपणे काहीही बडबड न करता आपले उदिष्ट्य धीम्यागतीने गाठत असतात. त्यांना सलाम.
कोण म्हणतो गेल्या ६६ (की ६०) वर्षांत काहीच झाले नाही.
| ||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा