कसाबच्या बिर्याणीची चौकशी, चौकशी पथकाला दिलेल्या मेजवानीचे काय ?……
कसाबला किती रुपयांची बिर्याणी खाऊ घातली याची सोशल मिडीयावर खूप चर्चा होत होती. परवा पठाणकोट हल्ल्याची चौकशी करायल पाकिस्तानचे पथक आले होते, त्यांना काय खाऊ घातले याची कुठलीच माहिती मिडीयात आली नाही. मात्र या चौकशी पथकाने पाकिस्तानात परत गेल्या गेल्या वमन केले ते कशाचे तर का हल्ला भारतानेच घडवून आणला. कसाबने मरतांना "या खुदा मुझे माफ कर दे, ऐसी गलती दोबारा नही करुंगा" असा पश्चाताप तरी व्यक्त केला होता. पाकिस्तानच्या चौकशी पथकाने मात्र खाल्या घराचे वासे मोजले आहेत व पठाणकोट हल्ल्याचे माप भारताच्याच पदरात घातले आहे. मोदिजींनी पाकिस्तानात उतरून चहा घेतला तो आम्हाला बराच महागात पडत चाललाय. तिकडे चीनहि म्हणतो अजहर मसूद दहशतवादी नाही. प्रखर राष्ट्रवाद्यांच्या कारकिर्दीत चीन व पाकिस्तान मिळून भारताची चिल्लर पार्टी करून टाकणार असे दिसते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा