मंगळवार, २६ एप्रिल, २०१६

रोडकरी दररोज महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळताहेत ……

महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे आणि केंद्रीय मंत्री
महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे आणि केंद्रीय मंत्री रोडकरी यांना 'रोड' शिवाय काही दुसरे दिसतच नाही. रोज सकाळी उठल्या उठल्या "इतके लाख कोटींचे (काळजीपूर्वक वाचा कोटींचे नव्हे तर लाख कोटींचे) रस्ते बांधतो, हेच वाचायला मिळते. कमीतकमी काळवेळ तरी पहायला पाहिजे. दुष्काळाबद्दल मात्र आतापर्यंत एकही विधान आलं नाही. जणू काही ते महाराष्ट्रातून निवडून आलेच नाहीत. त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचे होते परंतु त्यांची डाळ शिजली नाही, त्याचा आकस त्यांनी देवेन्द्रावर किंवा हायकमांडवर धरावा. महाराष्ट्राने त्यांचे काय घोडे मारले ? देवेन्द्रांची फजिती पाहण्यात त्यांनी धन्यता माणू नये. महाराष्ट्र त्यांचाच आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा