शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०१६

या आधी 1975 साली जेंव्हा इंदिरा हटाव मोहीम जोरात सुरु होती तेंव्हा विरोधकांना लोकनायकांच्या स्वरूपात दूसरे गांधी सापडले.

मात्र लोकनायकांनी "पोलीस व लष्कराच्या जवानांनी त्यांना त्यांच्या वरिष्ठlचे आदेश योग्य वाटतं नसल्यास ते पाळू नये असे आवाहन केले आणि ते दुसरा गांधी होण्याच्या शर्यतीतून बाहेर फेकल्या गेले.
खरच त्यांचा सल्ला पोलीस व लष्कराने मानला असता तर देशांत अराजक माजले असते.
स्वातंत्र्य आंदोलनाचे वेळी बहुसंख्य पोलीस कर्मचारी व लष्करी जवान भारतीय होते. तरीही गांधीजींनी कधीही असे आवाहन केले नाही. कारण गांधीजीना हे माहिती होते की देश स्वतंत्र झाल्यावर हेच पोलीस देशाची कायदा व सुव्यवस्था सांभाळणार आहेत व हेच लष्करी जवान देशाचे रक्षण करणार आहेत.

स्वतंत्र भारताला शिस्तबद्ध पोलीस दल व संरक्षण दलाची गरज पडेल ही दूरद्रुष्टी त्यांच्याजवळ होती.

1978 साली लोकनायकांना पुढे करून विरोधकांनाम सत्ता मिळाली खरी पण ती अट्ठावीस महिनेच टिकली.

त्यानंतर यूपीए-2 च्या कार्यकालात विरोधकांना परत दुसरा गांधी म्हणून अण्णांना समोर केले. आपली माणसे त्यांच्या भोवती पेरली व काम फत्ते झाल्यावर यथासमयी भाजपच्या छावणीत दाखल झाली.
सर्वसामान्य माणसाबद्दल कळवळ आणि पंधरावीस दिवस उपोषण करण्याची क्षमता याशिवाय अण्णांजवळ दूसरे भांडवल नव्हते.
1978 प्रमाणेच यावेळेस अण्णांना पुढे करून विरोधक 2014 मध्ये पुन्हा सत्ता मिळवण्यात यशस्वी झाले. तेँव्हाची सत्ता अट्ठावीस महीने टिकली. यावेळेस कदाचित दुप्पट काळ म्हणजे छप्पन महीने टिकेल असे वाटते (कारण त्यांनी जाहीर केले आहे की त्यांची छाती छप्पन इंचाची आहे, म्हणून एक अंदाज बांधला.
म्हणूनच मी अपेक्षा व्यक्त केली होती की दुसरा गांधी होणारच नाही काय?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा