सुरेश प्रभूंच्या निर्णयामुळे खाजगी बस चालकांना आनंदाच्या उकळ्या
दिवाळीला पुण्यावरून विदर्भात येणारांची संख्या हजारोत असते. खाजगी बसचालक यावेळेस प्रवाशांची प्रचंड लूट करतात. पुणे ते नागपूर-अमरावतीसाठी प्रसंगी दोन ते डीच हजार रुपयेही मोजावे लागतात. रेल्वेने पुणे-अमरावती-पुणे ही गाडी या हंगामात (व नेहमीसाठी पण) सोडावी ही जुनी मागणी.
तिला प्रभूंनी प्रतिसाद दिला.व एक महिन्याकरिता विशेष साप्ताहिक गाडी पुणे-अमरावती-पुणे धावणार आहे. मात्र ह्या गाडीचे वेळापत्रक म्हणजे असून अडचण नसून खोळंबा.
पुण्याहून ही विशेष साप्ताहिक गाडी दर बुधवारी दुपारी तीनला सुटून मध्यरात्रीनंतर पहाटे तीन वाजता अमरावतीस पोहोचते. आणि दर गुरुवारी अमरावतीहून दुपारी एक वाजता सुटून मध्यरात्री दोन वाजता पुण्यास पोहोचते. अमरावती हे वर्दळीचे स्टेशन नाही. रात्री रिक्षावाले सोडून सर्वत्र शुकशुकाट असतो. दोन्ही गंतव्य स्थानांना ही गाडी मध्यरात्री गैरसोयीच्या वेळी पोहोचणार असल्यामुळे तिला प्रतिसाद मिळणे कठीण आहे व म्हणजेच प्रवासी मिळत नाहीत याच सबबीखाली ती कायमची सुरु करता येत नाही असे उत्तर द्यायला प्रभू मोकळे.
प्रभूंनी एकाच दगडात दोन/तीन पक्षी मारले आहेत. कारण यावेळी पोहोचणारी गाडी देऊन त्यांनी ऑटो रिक्षावाल्यांनाही या लुटीत सामील करून घेतले आहे. प्रभूंची लीला अगाध आहे हेच खरे.
असाच प्रकार अमरावती-आगपूर-अमरावती इंटरसिटी एक्सप्रेस या गाडीबद्दल आहे. ती सकाळी साडे पाचला सुटते व इतक्या सकाळी शहराच्या सर्व भागातून स्टेशनकडे येण्यासाठी वाहनांची व्यवस्था नाही. ह्या गाडीची वेळ सकाळी साडे सहाची करावी या मागणीकडेही दुर्लक्ष केल्या जात आहे.
अशाच प्रकारे त्यांनी उधना(सुरत)-अमरावती साप्ताहिक विशेष गाडी दिली आहे ती सुद्धा अमरावतीला मध्यरात्री पोहोचणार आहे. म्हणजे तेच.
शिवाय सुरत-अमरावती-सुरत ही नियमित धावणारी त्रिसाप्ताहिक गाडी सुद्धा रात्री असावी अशी येथील व्यावसायिकांची मागणी आहे. कारण अमरावती येथील व्यावसायिक मोठ्या प्रमाणात सुरतला खरेदी साठी जात असतात व व्यवसायाची खोटी होऊ नये म्हणून ते रात्रीच्या प्रवासाला प्राधान्य देत असतात. परंतु ही गाडी कित्येक वर्षांपासून दिवसा धावते आहे.
राजेंद्र कडू
दिवाळीला पुण्यावरून विदर्भात येणारांची संख्या हजारोत असते. खाजगी बसचालक यावेळेस प्रवाशांची प्रचंड लूट करतात. पुणे ते नागपूर-अमरावतीसाठी प्रसंगी दोन ते डीच हजार रुपयेही मोजावे लागतात. रेल्वेने पुणे-अमरावती-पुणे ही गाडी या हंगामात (व नेहमीसाठी पण) सोडावी ही जुनी मागणी.
तिला प्रभूंनी प्रतिसाद दिला.व एक महिन्याकरिता विशेष साप्ताहिक गाडी पुणे-अमरावती-पुणे धावणार आहे. मात्र ह्या गाडीचे वेळापत्रक म्हणजे असून अडचण नसून खोळंबा.
पुण्याहून ही विशेष साप्ताहिक गाडी दर बुधवारी दुपारी तीनला सुटून मध्यरात्रीनंतर पहाटे तीन वाजता अमरावतीस पोहोचते. आणि दर गुरुवारी अमरावतीहून दुपारी एक वाजता सुटून मध्यरात्री दोन वाजता पुण्यास पोहोचते. अमरावती हे वर्दळीचे स्टेशन नाही. रात्री रिक्षावाले सोडून सर्वत्र शुकशुकाट असतो. दोन्ही गंतव्य स्थानांना ही गाडी मध्यरात्री गैरसोयीच्या वेळी पोहोचणार असल्यामुळे तिला प्रतिसाद मिळणे कठीण आहे व म्हणजेच प्रवासी मिळत नाहीत याच सबबीखाली ती कायमची सुरु करता येत नाही असे उत्तर द्यायला प्रभू मोकळे.
प्रभूंनी एकाच दगडात दोन/तीन पक्षी मारले आहेत. कारण यावेळी पोहोचणारी गाडी देऊन त्यांनी ऑटो रिक्षावाल्यांनाही या लुटीत सामील करून घेतले आहे. प्रभूंची लीला अगाध आहे हेच खरे.
असाच प्रकार अमरावती-आगपूर-अमरावती इंटरसिटी एक्सप्रेस या गाडीबद्दल आहे. ती सकाळी साडे पाचला सुटते व इतक्या सकाळी शहराच्या सर्व भागातून स्टेशनकडे येण्यासाठी वाहनांची व्यवस्था नाही. ह्या गाडीची वेळ सकाळी साडे सहाची करावी या मागणीकडेही दुर्लक्ष केल्या जात आहे.
अशाच प्रकारे त्यांनी उधना(सुरत)-अमरावती साप्ताहिक विशेष गाडी दिली आहे ती सुद्धा अमरावतीला मध्यरात्री पोहोचणार आहे. म्हणजे तेच.
शिवाय सुरत-अमरावती-सुरत ही नियमित धावणारी त्रिसाप्ताहिक गाडी सुद्धा रात्री असावी अशी येथील व्यावसायिकांची मागणी आहे. कारण अमरावती येथील व्यावसायिक मोठ्या प्रमाणात सुरतला खरेदी साठी जात असतात व व्यवसायाची खोटी होऊ नये म्हणून ते रात्रीच्या प्रवासाला प्राधान्य देत असतात. परंतु ही गाडी कित्येक वर्षांपासून दिवसा धावते आहे.
राजेंद्र कडू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा