शुक्रवार, २६ मे, २०१७

तीन वर्षात एकही पत्रकार परिषद घेण्याचे धाडस मोदी साहेब दाखवू शकले नाहीत

कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखे कमी आणि लपवण्यासारखेच अधिक आहे.

खरच जर स्वतःच्या कामगिरीवर विश्वास असेल तर एक पत्रकार परिषद घेऊनच दाखवावी साहेबांनी.
खोट्यानाट्या जाहिरातबाजीतून जनतेच्या नजरेत धूळफेक करण्यापेक्षा

सामोरे येऊन जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत.
आहे हिंमत?
डॉ हर्षल कदम यांची पोस्ट.

गुरुवार, १८ मे, २०१७

काल प्रमोद मांडे यांच्या भाषणातून मिळालेली माहिती

ओडिशामधील 'अठरा नाला' नामक पूल मराठयांनी अठराव्या शतकात बांधला. त्यावरून आजही अवजड वाहतूक होते. कटकमध्ये पण एक पूल मराठयांनी बांधला. तोसुद्धा वापरात आहे. कोणार्कचे सूर्यमंदीर वाळूखाली गाडले गेले होते. मराठयांनी ते उत्खनन करून प्रकाशात आणले. तेथील मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर असलेला स्तंभ मराठयांनी काढून पुरीच्या मंदिरात स्थापन केला. 
अठराव्या शतकाच्या सुरुवातीला कलकत्ता हे लहानसे गाव होते. मराठयांच्या वारंवार होणाऱ्या स्वाऱयांपासून संरक्षण व्हावे म्हणून इंग्रजांनी गावाभोवती खंदक खोदला. त्याला मराठा खंदक असे नाव पडले. आजही ते नाव कायम आहे. व त्याभागात राहणारे रहिवाशी आपला पत्ता सांगतांना मराठा खंदक (Maratha Ditch Lane) असा सांगतात.