मंगळवार, २२ जुलै, २०१४

मळवाटा नाकारतांना …… 
काही वर्षांपूर्वी मी शेतकरी संघटनेचा शुभचिंतक होतो. आमचे एक कार्यकर्ते मित्र एकदा म्हणाले आपल्याला पाचव्या वेतन आयोगाविरुद्ध आंदोलन करावयाचे आहे. मी म्हणालो. " तुमचे व माझे जेवढे जवळचे नातेवाइक भाऊ, काका, मामा, भाचे, पुतणे, सरकारी नोकरीत असतील त्यांच्याकडून आपण " आम्हाला पाचवा वेतन आयोग नको " असे लेखी पत्र घेऊया. आंदोलन करायचे कामच पडणार नाही. संघटनेच्या कार्यकर्त्यांची नोकरीत असलेल्या नातेवाईकांची संख्या  लाखोंच्या घरात जाईल. इतक्या मोठ्या संख्येने कर्मचारयांनी वेतन आयोग नाकारला तर सरकारचा नाईलाज होईल. " मात्र हा सल्ला आमच्या मित्राला आवडला नाही व ते आता पूर्वीसारखे आपुलकीने भेटत नाहित. मात्र मी केलेल्या सूचनेवरून वेतन आयोग नाकारणारी एकमेव व्यक्ती हेरंब कुलकर्णी यांचा मात्र संघटनेने अमरावती येथे झालेल्या जनसंसदेत सत्कार केला होता. शेतकऱ्यांचा शत्रू घरातच आहे मात्र आंदोलक मंडळी घराबाहेर भुई धोपटत आहेत. स्वतःच्या भावाविरुद्ध लढायचे म्हटले की त्यांचा अर्जुन होतो. " घरका भेदी लंका ढाये " तशी परिस्थिती आहे. इंग्रजांनी फक्त देशाची फाळणी केली देशी साहेबांनी मात्र गावोगावी सोसायट्या , पंचायती निर्माण करून आपल्या पुढील पिढ्यांची बेगमी करून ठेवली.  असो लेख अस्वस्थ करणारा आहे. जंगलात राहून अकबराविरुध लढा देत असतांना सामोपचाराने वागण्याचा सल्ला घेऊन येणाऱ्या राजा मानसिंगाला पाहुणचार करतांना त्याच्यासोबत जेवायला न बसणाऱ्या व मी तुमच्या सारख्या लाचारांच्या मांडीला मांडी लाऊन जेवत नसतो असे सुनावणाऱ्या राणा प्रतापांची वानवा आहे. असो. 
राजेंद्र कडू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा