गुरुवार, २४ जुलै, २०१४

अरामराज्ये 

तुमच्या एक लक्षात आले काय ? महिला व बालक यांच्यावरील  अत्याचाराच्या फक्त बिगर भाजप राज्यातील बातम्याच  इलेक्ट्रॉनिक मिडियावाले घोळवून घोळवून  सांगताहेत. फक्त उत्तरप्रदेश, बिहार येथील बातम्याच असतात. इतर राज्यांत जणू काही " रामराज्य " आहे. आता तर काय भाजपने आपला अनुभवी माणूस उत्तर प्रदेशात राज्यपाल म्हणून पाठविला आहे. म्हणजे राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे असा राज्यपालांनी अहवाल पाठविला की राज्यात वेळ न दवडता राष्ट्रपती राजवट लागू करायला केंद्र सरकार मोकळे. 
राजेंद्र कडू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा