समान नागरी कायद्यामुळे हिंदूंचे नुकसान होणार.
मोदी सरकार समान नागरी कायदा करण्याबद्दल गंभीरपणे विचार करत आहे असे वाचले. मात्र यामुळे एका बाबतीत निश्चितपणे हिंदू धर्मियांना झळ पोहोचणार आहे अशी मला भीती वाटते. हिंदूंच्या धार्मिक स्थळांवरून सकाळ/संध्याकाळ तासंतास लाउड स्पीकर सुरु असतो तर मुसलमानांच्या धार्मिक स्थळांवरून दररोज दिवसातून पाच वेळा प्रत्येकी दोन मिनिटे अजान प्रसारित केली जाते. समान नागरी कायदा झाला तर हिंदूंनासुद्धा दररोज दहा मिनिटेच लाउड स्पीकरचा वापर करता येईल. शिवाय सणावारी ( हनुमान जयंती, महाशिवरात्री ) सकाळपासून ते रात्रीपर्यंत लाऊड स्पीकर वाजविल्या जातो तोही बंद होईल. त्यामुळे हिंदूं धर्माचे नुकसान होईल. तरी माझी अशी सूचना आहे की निरनिराळ्या धर्माच्या लोकसंख्येनुसार लाउड स्पीकर वाजविण्याची वेळ ठरवून द्यावी म्हणजे कोणत्याही धर्मावर अन्याय होणार नाही व सगळ्यांसाठी एकाच कायदा व सर्वधर्मसमभाव हे तत्व पाळल्या जाईल.
राजेंद्र कडू
मोदी सरकार समान नागरी कायदा करण्याबद्दल गंभीरपणे विचार करत आहे असे वाचले. मात्र यामुळे एका बाबतीत निश्चितपणे हिंदू धर्मियांना झळ पोहोचणार आहे अशी मला भीती वाटते. हिंदूंच्या धार्मिक स्थळांवरून सकाळ/संध्याकाळ तासंतास लाउड स्पीकर सुरु असतो तर मुसलमानांच्या धार्मिक स्थळांवरून दररोज दिवसातून पाच वेळा प्रत्येकी दोन मिनिटे अजान प्रसारित केली जाते. समान नागरी कायदा झाला तर हिंदूंनासुद्धा दररोज दहा मिनिटेच लाउड स्पीकरचा वापर करता येईल. शिवाय सणावारी ( हनुमान जयंती, महाशिवरात्री ) सकाळपासून ते रात्रीपर्यंत लाऊड स्पीकर वाजविल्या जातो तोही बंद होईल. त्यामुळे हिंदूं धर्माचे नुकसान होईल. तरी माझी अशी सूचना आहे की निरनिराळ्या धर्माच्या लोकसंख्येनुसार लाउड स्पीकर वाजविण्याची वेळ ठरवून द्यावी म्हणजे कोणत्याही धर्मावर अन्याय होणार नाही व सगळ्यांसाठी एकाच कायदा व सर्वधर्मसमभाव हे तत्व पाळल्या जाईल.
राजेंद्र कडू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा