मंगळवार, ९ सप्टेंबर, २०१४

लोकशाहीचा चार स्तंभांपैकी एक एक स्तंभ पोखरलेला आढळून येत आहे. पत्रकारिता लक्ष्मीदेवीच्या प्रेमात गुरफटत चालली आहे. संसदेला कस्पटासमान मानणाऱ्या लोकांची मांदियाळी वाढते आहे. केवळ न्याय शाखा आपला एक खंबी तंबू सांभाळताना दिसत आहे. त्यातही आपल्यालाला सोयीस्कर असे निकाल देणाऱ्यांना बक्षिशी देऊन इतरांना एक सूचक संदेश दिल्या जात आहे. न्यायिक नेमणुकाही सरकार आपल्याकडे घेणार आहे. अशा वातावरणात एक सुखद धक्का म्हणजे परवा आलेला लष्कर लवादाचा निकाल. यात माजी लष्कर प्रमुख व विद्यमान केंद्रीय मंत्र्याचा मुलाहिजा न ठेवता लष्कराने आपला कणा ताठच आहे हे दाखवून दिले आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा