बहुतांश दिग्गज उमेदवार शेतीव्यवसायातून अफलातून उत्पादनाने झाले कोट्यधीश!
बहुतांश दिग्गज उमेदवारांचा व्यवसाय शेती, समाजकारण
जुने वाडे मोडले, शेतकरी उमेदवारांचे मात्र बंगले झाले उभे
कोणतं 'बेणं' वापरलं! कसं पिकलं, कुठं विकलं!
जिल्ह्यातील आठही िवधानसभा निवडणुकीच्या रींगणात उभे असलेल्या उमेदवारांनी संपत्तीचे विवरणपत्र निवडणूक आयोगाला सादर केले आहे. यात काही कोट्याधीश असलेल्या दिग्गज उमेदवारांनी शपथपत्रात आपला व्यवसाय शेती असल्याचे नमूद केले आहे. यातूनच ही माहिती पुढे आली आहे. शेतमालाला खर्चाच्या तुलनेत मिळणारा भाव, मुजरांची टंचाई, पतपुरठ्याची समस्या, गंभीर आजारपण, वाढलेला खर्च, बीयाणांसाठी आलेले परावलंिबत्व, भानियमन, गारपीट, अतिवृष्टी आदी शेकडो कारणामुळे आर्थिक ताण सहन झाल्याने शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेती व्यवसायातील िवविध समस्यामुळे शेकडो एकर शेतीचे मालक असलेले काही शेतकरी अल्पभूधारक तर काही भूमिहीन झाले आहेत. जमीनदार असलेल्या शेतकऱ्यांचे वाडेही भुईसपाट झाले आहेत. जिल्ह्यात सोयाबीन, कपाशी, संत्रा, तूर, मूग, हरभरा आदी प्रमुख पिके आहे. पिढ्यािपढ्या शेती करूनही बहुतांश शेतकऱ्यांच्या कोसळलेल्या मातीच्या भींतीही उभ्या होऊ शकल्या नाही. शेतकऱ्यांना आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी शासनाने कोट्यावधीचे पॅकेज दिले. विविध योजना राबविण्यात येत आहे. उत्पादन वाढीसाठी संशोधक झटत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस बिकटच होत आहे. परंतु कोट्याधीश असणाऱ्या या शेतकऱ्यांनी नेमके कशाचे उत्पादन घेतले कोणत्या बाजारपेठेत विकले हे मात्र अनाकलनीय आहे. बदलत्या परिस्थितीमुळे शेती अडचणीत आली म्हणून शेकडो एकर जमिनीचे मालक आज अल्पभूधारक झाले. वाडेही भुईसपाट झाले. शेतीतून आर्थिक गणित बिघडल्याने जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी जीवही ला. परंतु विधानसभेच्या रींगणात असलेल्या बहुतांश दिग्गज उमेदवारांनी शेतीव्यवसायातून कोट्यावधीची 'माया' गोळा केली आहे. जिल्ह्यातील तमाम शेतकरी कृषी संशोधकांच्या थोबाडीत मारून या उमेदवारांनी हा उत्पादनाचा चमत्कार घडवला आहे. परंतु या शेतकऱ्यांनी नेमकं कोणते पीक घेऊन हा भरघोस कसा नफा कमावला हे मात्र कोडचं आहे. जिल्ह्यात जीवाचे रान करून आधुिनक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही कोट्याधीश होण्याचे हे तंत्रज्ञान अवगत होऊ शकले नाही. शेतीची अशी भीषण अवस्था असताना आठही मतदार संघात उभे असलेल्या काही उमेदवारांच्या तिजोऱ्या मात्र शेती व्यवसायातून 'तणफुगी'सारख्या फुगल्या आहेत. शपथपत्रात नमुद केल्याप्रमाणे या कोट्याधीश शेतकऱ्यांच्या नावे बॅंकेत लाखोच्या ठेवी, म्युच्युअल फंड, वीमा पॉलीसी, अलीशान गाड्या, लाखो रुपयांचे फ्लॅट, भूखंड, गुंतवणूक या उमेदवारांनी शेतीव्यवसायातूनच केल्या आहेत.
शेतकऱ्यांसाठीगळे काढणाऱ्या नेत्यांचा स्वार्थीपणा
एरव्ही सर्वच नेते मिळेल त्या व्यासपीठावरून शेतकऱ्यांसाठी गळे काढतात. त्यांच्या मदतीसाठी आपण कसे तत्पर होतो हे सांगतात. परंतु त्यांना कोट्याधीश होण्यासाठी गवसलेले 'तंत्रज्ञान' त्यांनी कधीच शेतकऱ्यांपर्यंत पोहचविल्याने या नेत्यांचा स्वार्थीपणाच दिसून येत आहे.
समाजसेवकही कोट्यधीश
गाडगेमहाराजांनीसतरा ठिगळांचे कपडे घालून किर्तनाच्या माध्यमातून समाजसेवा केली. परंतु त्यांच्या जवळ संपत्ती म्हणून फुटकी कवडीही आढळली नाही. जिल्ह्यातील काही उमेदवारांनी शपथपत्रात समाजसेवा व्यवसाय असल्याचे नमूद केले आहे. या समाजसेवेच्या माध्यमातून हे उमेदवार कोट्याधीश झाले आहेत. त्यांच्याकडे अलीशान गाड्या, कोट्यावधीचे भूखंड, गुंतवणूक, रोख रकमांची लक्ष्मी ही समाजसेवेच्या माध्यमातून आली आहे. त्यामुळे समाजसेवेच्या माध्यमातूनही कोट्याधीश होता येते हे जिल्ह्यात प्रथमच यातून समोर आले आहे.-सतीश भटकर,अमरावती
बहुतांश दिग्गज उमेदवारांचा व्यवसाय शेती, समाजकारण
जुने वाडे मोडले, शेतकरी उमेदवारांचे मात्र बंगले झाले उभे
कोणतं 'बेणं' वापरलं! कसं पिकलं, कुठं विकलं!
जिल्ह्यातील आठही िवधानसभा निवडणुकीच्या रींगणात उभे असलेल्या उमेदवारांनी संपत्तीचे विवरणपत्र निवडणूक आयोगाला सादर केले आहे. यात काही कोट्याधीश असलेल्या दिग्गज उमेदवारांनी शपथपत्रात आपला व्यवसाय शेती असल्याचे नमूद केले आहे. यातूनच ही माहिती पुढे आली आहे. शेतमालाला खर्चाच्या तुलनेत मिळणारा भाव, मुजरांची टंचाई, पतपुरठ्याची समस्या, गंभीर आजारपण, वाढलेला खर्च, बीयाणांसाठी आलेले परावलंिबत्व, भानियमन, गारपीट, अतिवृष्टी आदी शेकडो कारणामुळे आर्थिक ताण सहन झाल्याने शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेती व्यवसायातील िवविध समस्यामुळे शेकडो एकर शेतीचे मालक असलेले काही शेतकरी अल्पभूधारक तर काही भूमिहीन झाले आहेत. जमीनदार असलेल्या शेतकऱ्यांचे वाडेही भुईसपाट झाले आहेत. जिल्ह्यात सोयाबीन, कपाशी, संत्रा, तूर, मूग, हरभरा आदी प्रमुख पिके आहे. पिढ्यािपढ्या शेती करूनही बहुतांश शेतकऱ्यांच्या कोसळलेल्या मातीच्या भींतीही उभ्या होऊ शकल्या नाही. शेतकऱ्यांना आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी शासनाने कोट्यावधीचे पॅकेज दिले. विविध योजना राबविण्यात येत आहे. उत्पादन वाढीसाठी संशोधक झटत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस बिकटच होत आहे. परंतु कोट्याधीश असणाऱ्या या शेतकऱ्यांनी नेमके कशाचे उत्पादन घेतले कोणत्या बाजारपेठेत विकले हे मात्र अनाकलनीय आहे. बदलत्या परिस्थितीमुळे शेती अडचणीत आली म्हणून शेकडो एकर जमिनीचे मालक आज अल्पभूधारक झाले. वाडेही भुईसपाट झाले. शेतीतून आर्थिक गणित बिघडल्याने जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी जीवही ला. परंतु विधानसभेच्या रींगणात असलेल्या बहुतांश दिग्गज उमेदवारांनी शेतीव्यवसायातून कोट्यावधीची 'माया' गोळा केली आहे. जिल्ह्यातील तमाम शेतकरी कृषी संशोधकांच्या थोबाडीत मारून या उमेदवारांनी हा उत्पादनाचा चमत्कार घडवला आहे. परंतु या शेतकऱ्यांनी नेमकं कोणते पीक घेऊन हा भरघोस कसा नफा कमावला हे मात्र कोडचं आहे. जिल्ह्यात जीवाचे रान करून आधुिनक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही कोट्याधीश होण्याचे हे तंत्रज्ञान अवगत होऊ शकले नाही. शेतीची अशी भीषण अवस्था असताना आठही मतदार संघात उभे असलेल्या काही उमेदवारांच्या तिजोऱ्या मात्र शेती व्यवसायातून 'तणफुगी'सारख्या फुगल्या आहेत. शपथपत्रात नमुद केल्याप्रमाणे या कोट्याधीश शेतकऱ्यांच्या नावे बॅंकेत लाखोच्या ठेवी, म्युच्युअल फंड, वीमा पॉलीसी, अलीशान गाड्या, लाखो रुपयांचे फ्लॅट, भूखंड, गुंतवणूक या उमेदवारांनी शेतीव्यवसायातूनच केल्या आहेत.
शेतकऱ्यांसाठीगळे काढणाऱ्या नेत्यांचा स्वार्थीपणा
एरव्ही सर्वच नेते मिळेल त्या व्यासपीठावरून शेतकऱ्यांसाठी गळे काढतात. त्यांच्या मदतीसाठी आपण कसे तत्पर होतो हे सांगतात. परंतु त्यांना कोट्याधीश होण्यासाठी गवसलेले 'तंत्रज्ञान' त्यांनी कधीच शेतकऱ्यांपर्यंत पोहचविल्याने या नेत्यांचा स्वार्थीपणाच दिसून येत आहे.
समाजसेवकही कोट्यधीश
गाडगेमहाराजांनीसतरा ठिगळांचे कपडे घालून किर्तनाच्या माध्यमातून समाजसेवा केली. परंतु त्यांच्या जवळ संपत्ती म्हणून फुटकी कवडीही आढळली नाही. जिल्ह्यातील काही उमेदवारांनी शपथपत्रात समाजसेवा व्यवसाय असल्याचे नमूद केले आहे. या समाजसेवेच्या माध्यमातून हे उमेदवार कोट्याधीश झाले आहेत. त्यांच्याकडे अलीशान गाड्या, कोट्यावधीचे भूखंड, गुंतवणूक, रोख रकमांची लक्ष्मी ही समाजसेवेच्या माध्यमातून आली आहे. त्यामुळे समाजसेवेच्या माध्यमातूनही कोट्याधीश होता येते हे जिल्ह्यात प्रथमच यातून समोर आले आहे.-सतीश भटकर,अमरावती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा