शनिवार, १ नोव्हेंबर, २०१४

पाकिस्तानची आणि भाजपची एकच गोची 

पाकिस्तानमध्ये शाळांमधून इतिहास शिकवतांना काय शिकवावे हा प्रश्न पडतो. स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास शिकवावा तर कॉंग्रेसचा उल्लेख अपरिहार्य होतो त्यामुळे पाकिस्तानात विद्यार्थ्यांना गाळून इतिहास शिकवावा लागतो. भाजपचेही तसेच झाले आहे स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास शिकवायचा म्हणजे कॉंग्रेसचा उल्लेख टाळता येत नाही. त्यामुळे भाजपनेही आता इतिहास गाळून सांगायचे ठरविले आहे. या गाळणीची भोके सोयीची  ठेवली आहेत. त्यातून गांधी, नेहरू सारखी मंडळी खाली पडतात तर पटेलांसारखी काही नावे गाळनीतच राहतात. आता तर लोकेश चंद्र नावाच्या विद्वानाने मोदी हे गांधीजिंपेक्षाही उजवे आणि दैवी अवतार असल्याचा शोध लावला आहे. सूर्य मावळतीला गेलाकी खुज्या माणसांच्या सावल्याही लांब पडतात असे म्हणतात त्याचा प्रत्यय येत आहे. --- राजेंद्र कडू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा