बुधवार, १२ नोव्हेंबर, २०१४


दिलीप कुलकर्णी फोन इन्टरनेट वापरत नाहीत. मातीच्या घरात राहतात. वीज फक्त दिव्यांपुरती वापरतात. पंखे वापरत नाहीत. खेड्यात राहतात. टेल्को मध्ये इंजिनियर होते. पर्यावरणपूरक जीवनशैलीने जगतात. लोकांचे प्रबोधन करण्यासाठी " गतिमान संतुलन " हे चार पानी मासिक चालवतात. काळी पांढरी छपाई असते व कुठलीही जाहिरात नसते. कुठल्याही विषयावर ते वेगळाच विचार मांडतात की ज्याबद्दल आपण विचारही केला नसतो. त्यांची पंधरा पुस्तके प्रसिध्द झालेली आहेत. ही पुस्तके उज्ज्वल ग्रंथ भांडार , आप्पा बळवंत चौक , पुणे येथे उपलब्ध आहेत. त्यांना २०११ साली वर्ध्याला डॉ. उल्हास जाजू यांनी जाहीर केलेला त्यांच्या आजोबांच्या नावाने असलेला पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. विकास म्हणजे विनाश या विषयावर ते पूर्ण दिवसाची कार्यशाळा घेतात. पर्यावरण साहित्य संमेलन दापोली येथे कमीत कमी खर्चात घेतले. ते भारताचे मार्क बॉईल आहेत. त्यांच्याशी संपर्क फक्त पोस्टकार्ड द्वारेच होऊ शकतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा