आपण भाग्यवान आहोत की…
आपल्या धर्मातील अपप्रवुत्तींवर टीका केली जाते. त्यामुळे धर्मात खूप सुधारणा झाल्या आहेत. अगदी सतीची चाल बंद करण्यापासून ते अंधश्रद्धा निर्मुलन कायदा करण्यापर्यंत. जे इतर धर्म एव्हढे सहिष्णू नाहीत त्यांच्यात अशा सुधारणा होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे मला आनंद होत नसून त्यांच्याबद्दल कणव वाटते. त्यांच्यातही एखादा राजा राममोहन रॉय किंवा दाभोळकर जन्माला यावा अशी माझी देवाजवळ प्रार्थना आहे. तुकारामांनी म्हटलेच आहे " निंदकाचे घर असावे शेजारी ".
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा