रविवार, ७ फेब्रुवारी, २०१६

  श्वेत्ता भट्टड यांनी शेतकऱ्यांच्या व्यथांकडे लक्ष वेधण्यासाठी दोन तास स्वत:ला जमिनीत पुरून घेतले. जनमंचच्या नागपूरच्या शेतकरी मेळाव्यात सामाजिक कार्यकर्त्या आर्टीस्ट श्वेत्ता भट्टड यांनी शेतकऱ्यांच्या व्यथांकडे लक्ष वेधण्यासाठी दोन तास स्वत:ला जमिनीत पुरून घेतले. पर्यावरण परिषदे दरम्यान पॅरीस येथे स्वत:ला शवपेटीत पुरून घेऊन पर्यावरणाच्या ऱ्हासाकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर तिसऱ्यांदा त्यांनी नागपुरात हे प्रतिकात्मक आंदोलन केले. देशपांडे सभागृहाच्या परिसरात खड्डा खणून त्यात कॉफीन ठेवली. श्वेता भट्टड यांनी त्यात दोन तास घालवले. कॉफीनमध्ये हवेचा पुरवठा होईल, अशी व्यवस्था केली होती. डॉक्टरांची चमूही सज्ज होती. सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून त्यांच्यावर देखरेख ठेवली जात होती. पुणे, पॅरिसनंतर तिसऱ्यांदा नागपुरातच हे प्रतिकात्मक आंदोल करीत असल्याचे श्वेता भट्टड यांनी सांगितले. जगात शेतकऱ्यांची हीच परिस्थिती असल्याचे शेतकऱ्यांशी संवाद साधल्यावर आपल्या लक्षात आले, असेही त्या म्हणाल्या. या प्रतिकात्मक आंदोलनात जीवाला धोका असल्याने आम्ही श्वेताला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या निर्धारापुढे आमचे काही चालले नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी तिच्या आईने व्यक्त केली.(सविस्तर बातमी आजच्या दिव्यमराठीमध्ये)





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा