शुक्रवार, १८ मार्च, २०१६

प्लास्टिक कचरा उचलला नाही तर आयोजकांना दंड ……

विवाह,राजकीय सभा, धार्मिक कार्यक्रम किंवा सार्वजनिक कार्यक्रमानंतर त्या ठिकाणी पडलेला प्लास्टिकचा कचरा आयोजकांनी उचलला नाही तर त्याविरुद्ध दंड आकारला जाईल. ग्रामीण भागासाठीही हा नियम लागू असेल. केंद्र सरकारने शुक्रवारी ही घोषणा केली. पर्यावरण मंत्रालयाने प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन नियम-२०१६ अन्वये हा इशारा दिला आहे. नव्या नियमात प्लास्टिक पिशव्यांची किमान जाडी ५० मायक्रॉन करण्यात आली आहे. देशभरात १५ हजार टन प्लास्टिक कचरा रोज साठतो.
(०६ हजार टन शहरांत, ६ हजार ग्रामीण भागांत), पैकी
०९ हजार टन फक्त उचलला जातो.(दिव्यमराठी)
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा