बुधवार, १८ मे, २०१६

अनिल बोकील यांची क्रांतिकारी विचार

 आपल्या खिशात भरपूर नोटा असाव्यात असंकोणाला वाटणार नाही ? पण आपल्या खिशातपन्नास रुपयापेक्षा मोठी नोट असणे हाच 'इक़ॉनॉमिकल ' लोचा आहे. या मोठ्या नोटांमुळेचबेकारी, काळा पैसा, भ्रष्टाचार, महागाईआणि आर्थिक मंदी बोळाळलीय... हे सारेटाळण्यासाठी देशातील पन्नासच्या वरील सर्वनोटा बंद करा......असे सांगत गेली काही वर्षं औरंगाबादचा एकअर्थतज्ज्ञ देशभर हिंडतोय. आपले हे 'अर्थक्रांती ' चे स्वप्नसाकारण्यासाठी तो आपली ही थेअरी लेख, पुस्तके,टीवी, इंटरनेटच्या माध्यमातून तो लोकांपर्यंतपोहोचवतोय. त्याची ही थेअरी पाहून थेट पंतप्रधान,राष्ट्रपतीही चाट पडलेत. राष्ट्रपती प्रतिभाताईपाटलां व नरेंद्र मोदीनीं तर, ' जेव्हा मी या विधेयकावर सही करेनतो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षणअसेल ' असे सांगितलेय....त्या क्रांतिवेड्या अर्थतज्ज्ञाचे नाव आहे... अनिलबोकील .अर्थशास्त्र म्हणजे काहीतरी किचकट, अगम्य असंसमजून आपण कायमच त्याकडे दुर्लक्ष करतो. पणअनिल बोकील तो अधिकाधिक सोपा करूनआपल्याला सांगण्याचा आटापिटा करताहेत. कारणपैसा हा आपल्या आयुष्याचा सर्वातमहत्त्वाचा आणि आवडता भाग आहे. पण त्यामागचेअवघड गणित समजून घ्यायची आपली तयारी नसते.म्हणूनच त्यातला अवघडपणा काढला तर ते अधिकपारदर्शी होईल, असा बोकील यांना विश्वास आहे.आपल्याकडे पन्नासाहून मोठी नोट नको, असे बोकीलपुन्हापुन्हा सांगतात. आपले हे म्हणणे पटवूनदेण्यासाठी ते एक सोपे उदाहरण देतात. ते म्हणतात,अमेरिकेला आपण प्रगत देश म्हणतो. अमेरिकेचेदरडोई उत्पन्न ४० हजार डॉलर आहेआणि त्यांची सर्वात मोठी नोट १०० डॉलर आहे.म्हणजेच त्यांच्या दरडोई उत्पन्नाचेमोठ्या नोटेशी असलेले प्रमाण हे ४०० पट आहे.तसेच ब्रिटन आणि जपानचेही पौंडआणि येनशी असेलेले प्रमाण हेदेखील ४०० पटीचेआहे. पण भारताचे दरडोई उत्पन्न २३ हजारआणि सर्वात मोठी नोट १००० रुपयाची आहे. म्हणजेहे प्रमाण फक्त २३ एवढे आहे. कशासाठी ?या कमी प्रमाणामुळेच देशातकाळ्या पैशाची निर्मिती होते. आपल्याकडीलव्यवहार रोखीच्या माध्यमातून होतात. लोकबॅकेच्या माध्यमातून व्यवहारकरण्याऐवजी रोखीच्या माध्यमातून व्यवहारकरतात. त्यामुळे या व्यवहारांची नोंद राहतनाही आणि काळा पैशावर आधारित भ्रष्टअर्थव्यवस्था जन्माला येते. बोकील यांच्या मतेआज आपल्या देशातील ८० टक्के व्यवहाररोखीच्या माध्यमातून होतात. तेच प्रगत देशात ९०टक्के व्यवहार बँकेच्या माध्यमातूनहोताना आढळतात.या रोखीच्या व्यवहारामुळेच काय घडू शकते, याचेउदाहरण द्यायचे तर भारतीय संसदेवरझालेल्या हल्ल्याचे देता येईल. ११ सप्टेंबर २००१मध्ये अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला.त्याच्यापोठापाठ १३ डिसेंबर २००१रोजी भारताच्या संसदेवरही हल्ला झाला.अमेरिकेला अल-कायदाचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यातयश मिळाले. पण भारतात मात्र संसदेवरहल्ला करणा-या लष्कर-ए-तोयबाचे नेटवर्कउद्ध्वस्त करता आले नाही. याचे कारण अमेरिकेनेअल-कायदाची सारी अकाउंट्स सीझ केली. त्यामुळेअल्-कायदाची पैसा हीच ताकद संपल्याने नेटवर्कउद्ध्वस्त करता आली. पण भारतातबहुतांशी व्यवहार रोखीच्या माध्यमातून होतअसल्याने अशी अकाउंट्स सीझ करण्याचा काहीचफायदा झाला नाही.अमेरिकेचे माजी अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी १४जुलै १९६९ रोजी १०० डॉलरवरील सर्व नोटा रद्दकेल्या. याचे कारण अमेरिकेत प्रचंडकाळा पैसा वाढला होता. तसेच भारतातही आजया समांतर काळ्या इकॉनॉमीने हातपाय पसरलेआहेत. ती संपवण्यासाठी पन्नासरुपयांच्या वरची नोट बंद करणे हेच हिताचे ठरेल.भारतात रोजचे उत्पन्न २० रुपयांपेक्षा कमी असणा-यांची संख्या ७८ टक्के (८० कोटी लोक) आहेत.मात्र रिझर्व बँकेच्या अहवालानुसार १०० रुपयेआणि त्यापेक्षा मोठ्या (५०० आणि १०००) नोटांचेप्रमाण ९२ टक्के आहे. २००१ मध्ये देशात हजाररुपयांच्या नोटा ९७ हजार ६७६कोटी इतक्या किमतीच्या झाल्या आहेत. याचा अर्थरोखीने व्यवहार करायला सरकारच प्रोत्साहन देतेआहे. हे फक्त या मोठ्या नोटा रद्द झाल्या तरचटाळता येणे शक्य आहे.हे जसे झाले नोटांचे, तसाच एकलोच्या आपल्या करप्रणालीचा आहे. मुळातच टॅक्सचुकवणे ही मानवी प्रवृत्ती बनली आहे. त्यामुळेडायरेक्ट टॅक्सपेक्षाही इन्डायरेक्ट टॅक्स वसूलकरण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. एक सामान्यभारतीय जवळपास ३०-३२ प्रकारचे टॅक्स भरतअसतो.. तेही त्याच्या नकळत. म्हणजे जेव्हा आपणएखादा साबण घेतो तेव्हा त्याचे ४-५ रुपये आपणसरकारला विविध करांच्या रुपाने देत असतो.खरं तर एकंदरीतच भारतीयकरप्रणाली कमालीची गुंतागुंतीची आणि दुर्बोध आहे.एखाद्या चार्टर्ड अकांउटलाही ती सहजसोपी करूनसांगणे अवघड आहे. उदाहरण द्यायचे तरएका टीव्हीची किंमत मुंबईत ५००० हजार असेल तरपनवेलमध्ये ती ५५०० असू शकेल. कारण त्यातजकात लागू होते. तसेच जर तुम्ही तो मध्य प्रदेशातघ्याल तर तो तुम्हाला कदाचित ४५०० रुपयांना मिळूशकेल, कारण तेथील सेल्स टॅक्स स्ट्रक्चर वेगळेआहे. त्यामुळे एकच वस्तू देशाच्या विविध भागातविविध किमतींना उपलब्ध होते. त्यामुळेचकाळाबाजार तेजीत येतो. त्याहूनही डोकेदुखीची बाबम्हणजे, आपल्याच रुपयाची किंमत आपल्याच देशातविविध ठिकाणी वेगळी ठरते.या गुंत्यामुळे लोक जकात चुकवून काळ्या बाजारानेव्यापार करतात. बिलं न घेता वस्तू खरेदी करतात.या समांतर आणि काळ्या अर्थव्यवस्थेमुळेदेशाचा अब्जावधी रुपयांचा महसूल बुडतो. त्यामुळेचही करप्रणाली सोपी करणे अत्यंत गरजेचे आहे.तसेच लोकांवरील टॅक्सचं ओझं कमी केलं गेलं तरटॅक्स टाळण्याची प्रवृत्तीही कमी होऊ शकते. कारणअसा अवाढव्य टॅक्स कमी झाला आणि तर तो भरून' गॅरेंटेड ' माल घेणे कोणीही पसंत करेल.यासाठी बोकील एक साधीसोपी करप्रणाली सुचवतात.दोन देशांमध्ये असलेली इम्पोर्टड्युटी वगळता देशातील सर्व म्हणजे केंद्र , राज्य ,स्थानिक स्वराज्य संस्थांचे टॅक्स रद्द करावेत.त्याऐवजी सरकारने बॅंकेतून होणा-या व्यवहारांवरकाही विशिष्ट प्रमाणात (उदा. २ टक्के) ट्रॅन्झॅक्शनटॅक्स लागू करावा. हा टॅक्स थेट बॅंकेतूनचवजा होणार असल्याने दरवर्षी शेवटी टॅक्सभरण्यासाठी होणारा आटापिटाही बंद होईल. गरिबांवरकरांचा बोजा नको म्हणून रोखीच्या व्यवहारांवरकुठलाही कर आकारला जाणार नाही.म्हणजेच समजा मी तुम्हाला चेकद्वारे १०० रुपयेदिले. तर माझ्या अकाउंटमधून १०० रुपये वजा होतीलपण तुमच्या अकांउटला मात्र ९८ रुपयेचजमा होतील. त्या दोन रुपयांपैकी ७० पैसे केंद्रसरकारला, ६० पैसे राज्य सरकारला, ३५पैसेमहानगरपालिकेसारख्या स्थानिकसंस्थेला आणि उरलेले ३५ पैसेबँकेला महसुलाच्या स्वरूपात मिळतील. यामुळेसरकारला आपल्या कामासाठी सतत महसूल उपलब्धहोत राहील आणि जनतेचीही टॅक्सच्या जंजाळातूनसुटका होईल.या पद्धतीतून अनेक गोष्ट साध्य होतील. सर्वातमहत्त्वाचे म्हणजे इन्डायरेक्ट टॅक्स संपल्यामुळेवस्तूंच्या किंमती कमी होतील. आपण आज जेचायनाच्या स्वस्त मार्केटचा बाऊ करतो,तो करण्याची वेळच येणार नाही. तसेच समानतेचेसूत्र पाळले जाईल. देशातील सर्वठिकाणी एका वस्तूची किंमत समान राहीलआणि त्यामुळे रुपयाचीही किंमत समान राहील.या करप्रणालीसोबतच बोकील म्हणतात की, २०००रुपयांवरील रोख व्यवहार बेकायदा ठरवावावेत.जेणेकरून बँकमनी वाढेल आणि बाजारात फक्तपैसा नाही तर भांडवलही वाढेल. कारण आपल्याकडेपैसा खूप आहे भांडवल नाही. आपल्याकडेअसलेला पैसा हा योग्य हातात योग्यवेळी पडण्यासाठी असलेली यंत्रणाच कमकुवत ठरतेआहे. त्यासाठीचआपल्या देशाला या अर्थक्रांतीशिवाय पर्याय नाही.अनिल बोकील ज्याला अर्थक्रांती म्हणतात ,ती थोडक्यात अशी आहे१) आयातकर वगळता देशातील सर्व म्हणजे केंद्र ,राज्य , स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर काढूनटाकावेत.२) सरकारी खर्चासाठी (कराला पर्याय) बँकेतूनहोणा-या व्यवहारांवर काही विशिष्ट प्रमाणात(उदा. २ टक्के) व्यवहारकर हा एकमेव कर लागूकरणे. ज्यांच्या नावावर बॅंकेत रक्कम जमा होते ,त्यांच्याकडून हा कर बॅंकेतूनच कापून घेतला जाईल.३) या मार्गाने जमा होणा-या कराचे वाटप केंद्र ,राज्य , पालिका-महापालिका असे निश्चित करूनती रक्कम त्या सरकारच्या नावावर जमा होईल.४) रोखीच्या व्यवहारांवरमर्यादा आणण्यासाठी पन्नासरुपयांच्या वरच्या नोटा चलनातून काढून टाकण्यातयेतील.५) विशिष्ट मर्यादेपर्यंतच (उदा. रु. २०००) रोखव्यवहारास सरकारी मान्यता मिळेल. त्यापुढीलरोखीचे व्यवहार बेकायदा मानले जातील.६) गरिबांवर करांचा बोजा नको म्हणूनरोखीच्या व्यवहारांवर कुठलाही कर न नसेल.या पद्धतीमुळे आता असलेला काळा पैसाही मुख्यप्रवाहात येईल. एकंदरीतचअर्थव्यवस्था शुद्धिकरणाची प्रक्रिया यातून साध्यहोईल. कारण आज निवडणुकीपासून सर्व व्यवहारकाळ्यापैशावर आधारीत आहे . हेराजकारणी काळ्या पैशाची निर्मिती करत नाही पणत्याचा वापर करतात . सामान्यजनताही या प्रक्रियेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सहभागी होत असते. तेरोखण्यासाठी २००० रुपयांवरील प्रत्येकव्यवहाराची नोंद ठेवणारी हा पद्धत ' जादुई ' ठरूशकेल.अनिल बोकील मांडत असलेली ही थेअरी या देशातक्रांती घडवायला सज्ज आहे. पण कोणताच बदललगेच न स्वीकरणा-या या देशाला उत्क्रांतीवरजास्त विश्वास आहे, याचे पूर्ण भानबोकीलांना आहे. त्यांना जेव्हा विचारले जाते,की तुमची ही पद्धत क्रांतिकारी आहे, तर तातडीनेस्वीकारली का जात नाही ? तर ते एक गोष्टसांगतात...आपण सारे एका जहाजावर आहोत. या जहाजावरमजले आहेत. तळातल्या मजल्यावर सामान्य माणूसआहे, त्यावर श्रीमंत, उद्योगपती आहेतआणि सर्वात शेवटच्या माळ्यावर कायदा करणारेराजकारणी आहेत. पण या जहाजाला खालून भोकपडलंय... कुणी कुठेही असला तरी जहाज बुडणारआहे. त्यामुळे खालचे मेले तरी वरच्यांनाही मरावेचलागेल. त्यामुळे भोकबुजवण्यासाठी राजकारण्यांनाही झुकावेच लागेल.फक्त प्रश्न केव्हा याचाच आहे ?बोकीलांचा हा आशावादच आपल्याला उभारी देणारआहे. कारण दिवाळीच्या मुहूर्तावर दिवाळंनिघाल्याची बोंब मारत जागतिक मंदी आली असली..तरी पुढे फक्त अंधारच नाही.. तर अर्थक्रांतीचेआशेचे किरणही आहेत....  It is really revolutionary idea plzzz share this wid yr frnds..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा