माझ्या पोस्टवर आलेल्या कॉमेंटला मी दिलेले उत्तर ……
संधी कुणी दुसरा देत नसतो, संधी वारंवार आपले दार ठोठावत असते. तयारीत राहून झडप घालावी लागते. विदर्भ खूप वर्ष गुलामगिरीत होता. पश्चिम महाराष्ट्र शिवाजी महाराजांपासून स्वातंत्र्याचा उपभोग घेतोय. त्यामुळे शैक्षणिक संस्थांचे तुकडे फेकले की विदर्भवीर गपगार होऊन जातात.
मुख्य मुद्दा हा आहेकी सर्व मराठी माणसांनी एक राहणे गरजेचे आहे. कारण मराठ्यांचे राज्य एकेकाळी संपूर्ण भारतात होते. त्याची दहशत अजून गेलेली नाही. त्यामुळे मराठ्यांना दाबून ठेवा हे दिल्लीकरांचे धोरण आधीपासूनचे आहे.
उदा. १९५६ साली भाषावार प्रांतरचना झाली तेंव्हा प्रत्येक भाषेला एक राज्य मिळाले. मात्र मराठी भाषेचे स्वतंत्र राज्य न देता त्याची गुजरातशी तीन पायांची शर्यत लावून देण्यात आले व मुंबई राज्याची निर्मिती करण्यात आली. भीती एकच मराठी माणूस शिरजोर होऊ नये म्हणून. नंतर चार वर्षे झगडल्यानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. आणी नंतर महाराष्ट्र हे संपूर्ण भारतात अग्रेसर राज्य बनले.( त्याची मी अनेक उदाहरणे देऊ शकेल).
सध्याही महाराष्ट्र न. १ आहे. परप्रांतीयांना महाराष्ट्र आवडतो तो फक्त रोजीरोटी मिळते म्हणून नव्हे तर महाराष्ट्रासारखे प्रगतीशील सामाजिक वातावरण इतर प्रांतात नाही.
तेंव्हा अवघा मराठी मुलुख एक रहावा ही तो श्रींची इच्छा. भावनिक होऊन चालणार नाही.
डॉ किशोर फुले म्हणतात विदर्भ वेगळा होणे म्हणजे "नांदत्या घरातून टू बीएचके फ्ल्याटमध्ये रहायला" जाण्यासारखे आहे, United we stand, divided we fall.
संधी कुणी दुसरा देत नसतो, संधी वारंवार आपले दार ठोठावत असते. तयारीत राहून झडप घालावी लागते. विदर्भ खूप वर्ष गुलामगिरीत होता. पश्चिम महाराष्ट्र शिवाजी महाराजांपासून स्वातंत्र्याचा उपभोग घेतोय. त्यामुळे शैक्षणिक संस्थांचे तुकडे फेकले की विदर्भवीर गपगार होऊन जातात.
मुख्य मुद्दा हा आहेकी सर्व मराठी माणसांनी एक राहणे गरजेचे आहे. कारण मराठ्यांचे राज्य एकेकाळी संपूर्ण भारतात होते. त्याची दहशत अजून गेलेली नाही. त्यामुळे मराठ्यांना दाबून ठेवा हे दिल्लीकरांचे धोरण आधीपासूनचे आहे.
उदा. १९५६ साली भाषावार प्रांतरचना झाली तेंव्हा प्रत्येक भाषेला एक राज्य मिळाले. मात्र मराठी भाषेचे स्वतंत्र राज्य न देता त्याची गुजरातशी तीन पायांची शर्यत लावून देण्यात आले व मुंबई राज्याची निर्मिती करण्यात आली. भीती एकच मराठी माणूस शिरजोर होऊ नये म्हणून. नंतर चार वर्षे झगडल्यानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. आणी नंतर महाराष्ट्र हे संपूर्ण भारतात अग्रेसर राज्य बनले.( त्याची मी अनेक उदाहरणे देऊ शकेल).
सध्याही महाराष्ट्र न. १ आहे. परप्रांतीयांना महाराष्ट्र आवडतो तो फक्त रोजीरोटी मिळते म्हणून नव्हे तर महाराष्ट्रासारखे प्रगतीशील सामाजिक वातावरण इतर प्रांतात नाही.
तेंव्हा अवघा मराठी मुलुख एक रहावा ही तो श्रींची इच्छा. भावनिक होऊन चालणार नाही.
डॉ किशोर फुले म्हणतात विदर्भ वेगळा होणे म्हणजे "नांदत्या घरातून टू बीएचके फ्ल्याटमध्ये रहायला" जाण्यासारखे आहे, United we stand, divided we fall.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा