सावरकरांचा खोटा आशावाद होता.
सावरकरांनी असे म्हटले होते की, युरोपने जी प्रगती चारशे वर्षांत केली ती आपल्याला चाळीस वर्षांत करायची आहे. मात्र सावरकर हे विसरतात की युरोपिय देशांच्या ताब्यात अनेक आशियाई, आफ्रिकी देश होते व अशा मांडलिक देशातील नैसर्गिक साधन संपत्ती वापरून त्या देशांनी औद्योगिक प्रगती केली. आपल्याला हीच प्रगती चाळीस वर्षांत करायची झाल्यास त्यांच्या दहापट (४००/४०) देश आपल्या ताब्यात असावे लागतील. आणि इतके देश पृथ्वीवरच नाहीत शिवाय आता कुठलाही देश कुण्या दुसऱ्या एखाद्या देशाच्या गुलामगिरीत असणे शक्यही नाही. आणि सध्या पृथ्वीवर असलेली नैसर्गिक संपत्ती झपाट्याने संपण्याच्या मार्गावर आहे. . त्यामुळे सावरकर म्हणतात तसे युरोपीय देशांनी ४०० वर्षांत केलेली प्रगती चाळीस वर्षांत करणे भारतालाच काय कुठल्याही देशाला शक्य नाही. - दिलीप कुलकर्णी, संपादक "गतिमान संतुलन, मु पो -कुडावळे, ता. दापोली, जि. -त रत्नागिरी पिन-४१५७१२.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा