गुरुवार, २ जून, २०१६

आज ३ जून. बत्तीस वर्षांपूर्वीची ती घटना ………

दहा वर्षे खलिस्तानी दहशतवाद्यांनी पंजाब मध्ये अनेक निरपराध नागरिकांची हत्या केली. समझोत्याचे सर्वप्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर शेवटी ३ जून १९८४ ला (म्हणजे आजच्याच दिवशी)  इंदिराजींनी 'ऑपरेशन ब्लू स्टार' या मोहिमेअंतर्गत लष्करी कारवाई करून दहशतवाद्यांचा निपा:त केला. शिखांचा स्वयंघोषित मसिहा  म्हणवून घेणाऱ्या व अमृतसरच्या सुवर्णमंदिरात  मांडून बसलेल्या भिंद्रानवाले हा या मोहिमेत मारल्या गेला. या घटनेचा खलिस्तानी दशहतवादी बदला घेतील याची सर्वांना कल्पना होती. इंदिराजींच्या निवासस्थानी असलेल्या सुरक्षा कर्मचारयांमध्ये काही शीख कर्मचारी होते. त्यांना तेथून हटवावे अशी अधिकाऱ्यांनी इंदिराजींना सुचना केली. मात्र इंदिराजींनी ही सुचना फेटाळून लावली. शेवटी व्हायचे तेच झाले. सुरक्षा कर्मचारयांनीच इंदिराजींची हत्या केली.
या मोहिमेच्या वेळेस लष्कर प्रमुख असलेले व निवृत्तीनंतर पुण्यात स्थाईक झालेले जनरल अरुण वैद्य यांची पुण्यात भरदिवसा हत्या करण्यात आली अशा प्रकारे खलिस्तानी दहशतवाद्यांचा दुष्ट मनसुबा प्रत्यक्षात आला.
कॉंग्रेसला स्युडो सेक्युलर (छद्म धर्मनिरपेक्ष) असे म्हटले जाते.  स्वत:च्या जीवाची भीती असूनसुद्धा शीख सुरक्षा कर्मचारयांना न हटविणाऱ्या इंदिराजींना स्युडो सेक्युलर म्हणावे काय?
इंदिराजींचा खून करणाऱ्या दहशतवाद्यांचा पंजाबमधील काही संघटना 'शहीद' म्हणून दरवर्षी त्यांचे 'पुण्य' स्मरण करतात. त्यांच्या नातेवाईकांचा सत्कार केल्या जातो.. तेथील अकाली दल सरकारच्या मनातही या खुन्यांबद्दल सहानुभूती आहे.
महात्माजींच्या खुन्याचेही आजकाल 'पुण्य'स्मरण केल्या जाते.
तिकडे तामिळनाडूतही राजीवगांधींच्या खुनातील शिक्षा भोगत असलेल्या आरोपींना केंव्हा सोडतो याची 'अम्मा' सरकारला घाई झाली आहे. कोर्टाने आडकाठी घातल्यामुळे ते लांबणीवर पडले आहे.
राजीवजींच्या खुनातील आरोपींची प्रियांका गांधी यांनी तुरुंगात भेट घेऊन आपण खरे गांधीवादी आहोत हे दाखवून दिले आहे. असा हा इतिहास आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा