शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०१६

सध्याच्या भाजपचे प्रिय आणि तत्कालीन जनसंघाचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याबद्दल थोडंसं....

१) 21ऑगस्ट1936 ला कलकत्त्यात झालेल्या एका बैठकीत मोहम्मद अली जीना यांच्या उपस्थितीत, त्यांचं कौतुक करताना मुखर्जी म्हटले, "स्वतः निश्चित केलेल्या आदर्शवादी लक्ष्याला यशस्वीरीत्या साध्य करणारे एक राष्ट्रवादी नेते म्हणजे जीना आहेत."
२) १९३९ ला सावरकरांच्या बंगाल दौऱ्याचा मोठा प्रभाव मुखर्जींवर होता. 17 फेब्रुवारी,1939 ला त्यांच्या डायरी मध्ये त्यांनी लिहिलं, "वयाच्या 33व्या वर्षी कुलगुरुची जबाबदारी चालून आली. अनेक सन्मान न मागता मिळाले. पण जसजसे वय वाढत आहे, तसतसे आर्थिक जबाबदाऱ्या वाढत आहेत. मला नियमित भरपूर उत्पन्नाची गरज दिवसेंदिवस जाणवत आहे. माझी सेवा घेऊन त्याचा मोबदला द्यायला कुणी तयार असेल का? बंगाल सरकारमध्ये तर मला काही संधी दिसत नाही"...…..दोनच वर्षात श्यामाप्रसाद मुखर्जी हे मुस्लिम लीग आणि हिंदू महासभेच्या युती सरकारचे उपमुख्यमंत्री झाले.
३) १२ डिसेंबर, 1941ला, लाहोरच्या मुस्लिम लीग च्या अधिवेशनात "स्वतंत्र पाकिस्तान" चा ठराव मांडणाऱ्या फझलुल हक यांच्या बंगाल मंत्रिमंडळात हिंदू महासभेचे श्यामाप्रसाद मुखर्जी सामील झाले.
४) त्यांनी सुभाषचंद्र बोस आणि सरथचंद्र बोस यांनाही "हिंदू" या उद्दिष्टयासाठी लढावं असे आवाहन केले होते पण दोघांनीही ते स्पष्ट शब्दात नाकारले.
५) "चले जावं" आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी बंगालचे तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर सर जॉन हर्बर्ट यांना 26जुलै1942ला पत्रं लिहून स्वतःची पूर्ण निष्ठा अर्पित करत लिहिल कि काँग्रेस चे हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी कठोर पावले उचलावीत आणि त्यात ते स्वतः पूर्ण साथ देतील.
६) तरीही नेहेरूनी त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलं. तो नेहेरूनचा मोठेपणा होता. मुखर्जी केंद्रीय मंत्री असतानाच अ) ३१ डिसेंबर 1947ला काश्मीर समस्या UN मध्ये उचलण्याचा निर्णय सर्वसंमतीने मंत्रिमंडळात झाला ब) 13 ऑगस्ट 1948 आणि 5जानेवारी1949 ला केंद्रीय मंत्रिमंडळानी काश्मीर समस्येवर सार्वमत घेण्याचा निर्णय सर्वसंमतीने UN ला पाठवला क) 17ऑक्टोबर1949ला काश्मीरला आर्टिकल370 मंजूर करून विशेष दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्वसंमतीने घेतला......याची शेख अब्दुल्लानी त्यांना 4फेब्रुवारी,1953 ला आठवण करून दिली तेव्हा श्यामाप्रसाद मुखर्जीनचा चेहरा "कुठे लपवू" असा झाला होता.....

काश्मीरमध्ये तुरुंगात अटक असताना आजारी पडून त्यांचा मृत्यू झाला आणि अशा माणसाला हे संघी शहिद म्हणतात.....ढोंग....

संदर्भ:

*** Leaves from a Diary, S.P.Mukherjee, Oxford University Press, 1993
***Mookherjee papers, ii-iv instalment, file no.75/1945-46
***Bengal divided:Hindu communalism and secularist, Cambridge University, page 183

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा