शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०१६

ज्यांनी १९७१ साली पाकिस्तानचे दोन तुकडे केले,
पाकिस्तानकडून लेखी शरणागती घेतली,
९३,००० पाक सैनिक ताब्यात घेऊन त्यांना भारतात आणले,
ज्यांनी सिक्कीम हे स्वतंत्र राष्ट्र अलगदपणे भारतात विलीन करून घेतले,
ज्यांनी संस्थानिकांचे तनखे (Privi Purses) व विशेषाधिकार रद्द करून,
त्यांना सामान्य लोकांच्या रांगेत आणून ठेवले,
वाजपेयीनीं ज्यांचा "दुर्गा" असा उल्लेख केला,
मराठी पत्रकारांनी ज्यांना "याह्यासुर मर्दिनी" अशी उपाधी दिली.

त्या इंदिराजींची आज शंभरावी जयंती.
--------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा