शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०१९

एव्हढे सारे अनर्थ केवळ अतिरेकी राष्ट्रवादामुळे ओढवले,
हिटलरने लोकांना भुरळ पाडली होती. तो प्रचंड बहुमताने निवडून आला होता. तो स्वतःला आर्य वंशाचा म्हणवून घ्यायचा. त्याच्या पक्षाचे चिन्ह स्वस्तिक होते. त्याने शेजारील देश ताब्यात घेणे सुरु केले. पण काही दिवसांतचं दोस्त राष्ट्रांच्या सैन्याने जर्मन सैन्याचा पराभव केला. हिटलरने आत्महत्या केली. हिटलरच्या पराभूत जर्मनीचे विजेत्या दोस्त राष्ट्रांनी दोन तुकडे केले. बर्लीन शहराचे पण दोन तुकडे केले. अर्ध्या बर्लीनभोवती, की जे पश्चिम जर्मनीला द्यायचे होते (पण जे पूर्व जर्मनीच्या हद्दीत होते), कॉंक्रीटची भिंत बांधूनत्यावर काटेरी तार लावण्यात आली. वॉच टॉवर उभारण्यात आले. संगीनधारी सैनिक डोळ्यात तेल घालून पहारा देऊ लागले.
एकाच शहरांत राहाणाऱ्यांना इकडून तिकडे जायला पासपोर्ट/व्हिसा लागू लागला. हे सर्व १९९१ पर्यंत सुरु होते. एव्हढे अनर्थ एका अतिरेकी राष्ट्रीवाद्यामुळे झाले.
--------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा