गुरुवार, २७ ऑगस्ट, २०१५

काल आयबीएन लोकमत वाहिनीवरील चर्चेत अविनाश धर्माधिकारी यांनी एका राजकीय मुस्लिम वक्त्याला हिंदीत बोलल्याबद्दल चांगलेच झापले. इतकी वर्षे महाराष्ट्रात राहूनही मराठी  बोलता न येण्याबद्दल त्यांनी त्या वक्त्याची कडक हजेरी घेतली. सत्यशोधक चळवळीचे नेते स्व. हमीद दलवाई यांनी भारतातील मुसलमानांना ते ज्या प्रदेशात राहतात तेथील भाषा, संस्कृती अंगीकारण्याचा सल्ला दिला होता. सध्या असे दिसते की त्या वक्त्याला मराठी समाजात नाही म्हणून इतर वक्तेही (त्यात भाजपचे माधव भंडारी अग्रेसर होते)  हिंदीत बोलतात व चर्चा जणू काही हिंदी वाहिनीवर सुरु आहे असे वाटते.
हिंदी वाहिनींवर हिंदी न बोलता येणाऱ्या व फक्त मराठीच बोलू शकणाऱ्या व्यक्तीला चर्चेसाठी बोलावले जाइल काय असा सवालही धर्माधिकारी यांनी केला व मराठीत बोलू न शकणाऱ्या वक्त्यांना चर्चेसाठी बोलावू नये अशी सुचनाही त्यांनी केली.
अर्थात  हमीद दलवाईंचा हा सल्ला फक्त मुसलमानांपुरता नसून  मुंबईत राहून उपजीविका करणाऱ्या व तरीही " हम तो युपीके हैं हम तो हिंदीमेही बोलेंगे" (खर म्हणजे त्या युपीच्यासुद्धा नाहीत) म्हणणाऱ्या महानायिकेला व महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या राहुनही स्वत:ला 'अमराठी'  समजणाऱ्या समस्त मंडळींनाही लागू होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा