रविवार, २० सप्टेंबर, २०१५

मराठी ही फक्त महाराष्ट्रातील मराठी जणांचीच भाषा आहे काय ? 


शिवाजी महाराराजांचे साम्राज्य तामिळनाडू मधील तंजावर प्रांतातही होते. भोसल्यांचे वंशज अजूनही तेथे राहतात. पण त्यांना मराठी येत नाही. लोकसभेच्या सभापती मा. सुमित्रा महाजन इंदूरला राहतात. मुळच्या कोकणातल्या. पण मला खात्री आहे त्यांचे कुटुंबीय मराठी बोलत नसतील. किंवा त्यांनी म्हटले असते की " मैं तो महाराष्ट्रसे हुं मराठीमेही बात करूंगी तर त्या तेथील मुन्शिपाल्टीत सुद्धा निवडून आल्या नसत्या. "महामहानायक रजनीकांत (महामहा कारण आपल्या महानायकापेक्षाही रजनीकांतचा दबदबा मोठा आहे) हा मुळचा महाराष्ट्राचा पण त्याने जर म्हटले असते ' मैं तो महाराष्ट्रका हुं मराठीमेही बात करुंगा " तर तो (दक्षिणेतला) महामहानायक झाला नसता. महाराष्ट्रात मात्र मराठी न येता महानायक, आमदार, खासदार, मंत्री, व्याघ्र दूत, किंवा मोडकी तोडकी मराठी बोलून पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य वन संरक्षक असे काहीही होता येते वर महानायीकेसारखे " हम तो युपीके हैं हम तो हिंदीमेंही बोलेंगे " असे महाराष्ट्राच्या जखमेवर मीठही चोळता येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा