शनिवार, २६ नोव्हेंबर, २०१६
मोदीजी,
आपण परवा एक बिनतोड सवाल केलात.
व्हाटसअप वापरता मग कॅशलेस व्यवहार का करत नाही?
तर त्याचे असे आहे मोदीजी,
व्हाटसप हा एक निरुपद्रवी प्रकार आहे.
व्हाटसप वापरतो म्हणजे काय तर आमच्यापैकी बहुतांश मंडळी इकडून आलेला संदेश तिकडे पाठविणे, आलेल्या संदेशावर उपलब्ध असलेल्या चित्रांपैकी एखादे चित्र प्रतिक्रिया म्हणून डकवणे इतपतच त्यांची मजल असते.
बऱ्याच मंडळींच्या फेसबुक अकाउंटवर प्रोफाइलशिवाय दुसरे काहीही नसते. व वाचलेल्या पोस्टवर लाईक करण्यापेक्षा जास्त त्यांचा तेथेही सहभाग नसतो.
स्वतंत्र संदेश तयार करून तो इतरांना पाठवणे वगैरे ज्यांना जमते अशी मंडळी फार थोडी आहे.
कॅशलेस व्यवहाराचे तसे नाही.
सायबर गुन्हे वाढले आहेत.
आजकाल कॉम्प्युटर/ स्मार्ट फोन हॅक होणे नित्याची बाब झाली आहे.
स्मार्ट फोन वरून ऑनलाईन व्यवहार केला तर तुमचे पासवर्ड, अकाउंटची माहिती, तुमच्या फोनचे तपशील वगैरे सहज चोरले जाऊ शकतात.
तुमची एव्हढी ५६ इंचाची छाती असूनही तुमच्या सरकारच्या वेब साईट्स अनेकदा हॅक झाल्या आहेत.
परवा तर म्हणे ट्विटरचा जनक असलेल्या व्यक्तीचेच ट्विटर अकाउंट हॅक झाले होते. आणि आम्ही तर फार किरकोळ आहोत.
आता साधी गोष्ट घ्या ना. कुणी तरी आम्हाला फोन करून सांगतो कि
'तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे तुमचा पासवर्ड सांगा.
आम्ही भीतीने घाबरून जाऊन धडाधड माहिती सांगून मोकळे होतो आणि आमचं बँक अकाउंट रिकामं होतं.
आजकाल स्माटफोन बरयाच लोकांकडे असतो. ज्यांना वापरता येत नाही त्यांच्याकडेही असतो. (माझ्याकडेही आहे), कारण तो स्टेटस सिम्बॉल (प्रतिष्ठेचे लक्षण) सिम्बॉल झालेला आहे. नोकरीला लागलेली मुलं आपल्या पालकांना स्मार्ट फोन घेऊन देतात. जेष्ठ नागरिकांचा वेळ त्यात जातो. ते काही टेक्नोसॅव्ही नसतात. त्यातील पूर्ण फंक्शन्स/फीचर्स सुद्धा ते वापरू शकत नाहीत.
मजूर वर्गाकडेपण स्मार्ट फोन आहेत. त्यांनाही त्याच्या वापराचे ज्ञान मर्यादित असते. सायबर धोक्याची त्यांना कल्पनाही नसते.
हे सर्व स्व. राजीव गांधींनी आणलेल्या कॉम्प्युटर क्रान्तीमुळे शक्य झाले आहे.
एक झाले युपीए सरकारने आणलेल्या आधार कार्डाच्या योजनेमुळे आता फसवणुकीला मोठया प्रमाणात आला बसणार आहे व बायोमेट्रिक ओळख घेणे सुरु केली तर व्यवहार अजून सुरक्षित होतील.
तेंव्हा तोपर्यंत ......
आपण परवा एक बिनतोड सवाल केलात.
व्हाटसअप वापरता मग कॅशलेस व्यवहार का करत नाही?
तर त्याचे असे आहे मोदीजी,
व्हाटसप हा एक निरुपद्रवी प्रकार आहे.
व्हाटसप वापरतो म्हणजे काय तर आमच्यापैकी बहुतांश मंडळी इकडून आलेला संदेश तिकडे पाठविणे, आलेल्या संदेशावर उपलब्ध असलेल्या चित्रांपैकी एखादे चित्र प्रतिक्रिया म्हणून डकवणे इतपतच त्यांची मजल असते.
बऱ्याच मंडळींच्या फेसबुक अकाउंटवर प्रोफाइलशिवाय दुसरे काहीही नसते. व वाचलेल्या पोस्टवर लाईक करण्यापेक्षा जास्त त्यांचा तेथेही सहभाग नसतो.
स्वतंत्र संदेश तयार करून तो इतरांना पाठवणे वगैरे ज्यांना जमते अशी मंडळी फार थोडी आहे.
कॅशलेस व्यवहाराचे तसे नाही.
सायबर गुन्हे वाढले आहेत.
आजकाल कॉम्प्युटर/ स्मार्ट फोन हॅक होणे नित्याची बाब झाली आहे.
स्मार्ट फोन वरून ऑनलाईन व्यवहार केला तर तुमचे पासवर्ड, अकाउंटची माहिती, तुमच्या फोनचे तपशील वगैरे सहज चोरले जाऊ शकतात.
तुमची एव्हढी ५६ इंचाची छाती असूनही तुमच्या सरकारच्या वेब साईट्स अनेकदा हॅक झाल्या आहेत.
परवा तर म्हणे ट्विटरचा जनक असलेल्या व्यक्तीचेच ट्विटर अकाउंट हॅक झाले होते. आणि आम्ही तर फार किरकोळ आहोत.
आता साधी गोष्ट घ्या ना. कुणी तरी आम्हाला फोन करून सांगतो कि
'तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे तुमचा पासवर्ड सांगा.
आम्ही भीतीने घाबरून जाऊन धडाधड माहिती सांगून मोकळे होतो आणि आमचं बँक अकाउंट रिकामं होतं.
आजकाल स्माटफोन बरयाच लोकांकडे असतो. ज्यांना वापरता येत नाही त्यांच्याकडेही असतो. (माझ्याकडेही आहे), कारण तो स्टेटस सिम्बॉल (प्रतिष्ठेचे लक्षण) सिम्बॉल झालेला आहे. नोकरीला लागलेली मुलं आपल्या पालकांना स्मार्ट फोन घेऊन देतात. जेष्ठ नागरिकांचा वेळ त्यात जातो. ते काही टेक्नोसॅव्ही नसतात. त्यातील पूर्ण फंक्शन्स/फीचर्स सुद्धा ते वापरू शकत नाहीत.
मजूर वर्गाकडेपण स्मार्ट फोन आहेत. त्यांनाही त्याच्या वापराचे ज्ञान मर्यादित असते. सायबर धोक्याची त्यांना कल्पनाही नसते.
हे सर्व स्व. राजीव गांधींनी आणलेल्या कॉम्प्युटर क्रान्तीमुळे शक्य झाले आहे.
एक झाले युपीए सरकारने आणलेल्या आधार कार्डाच्या योजनेमुळे आता फसवणुकीला मोठया प्रमाणात आला बसणार आहे व बायोमेट्रिक ओळख घेणे सुरु केली तर व्यवहार अजून सुरक्षित होतील.
तेंव्हा तोपर्यंत ......
शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०१६
ज्यांनी १९७१ साली पाकिस्तानचे दोन तुकडे केले,
पाकिस्तानकडून लेखी शरणागती घेतली,
९३,००० पाक सैनिक ताब्यात घेऊन त्यांना भारतात आणले,
ज्यांनी सिक्कीम हे स्वतंत्र राष्ट्र अलगदपणे भारतात विलीन करून घेतले,
ज्यांनी संस्थानिकांचे तनखे (Privi Purses) व विशेषाधिकार रद्द करून,
त्यांना सामान्य लोकांच्या रांगेत आणून ठेवले,
वाजपेयीनीं ज्यांचा "दुर्गा" असा उल्लेख केला,
मराठी पत्रकारांनी ज्यांना "याह्यासुर मर्दिनी" अशी उपाधी दिली.
त्या इंदिराजींची आज शंभरावी जयंती.
--------------------------------------------------------------
पाकिस्तानकडून लेखी शरणागती घेतली,
९३,००० पाक सैनिक ताब्यात घेऊन त्यांना भारतात आणले,
ज्यांनी सिक्कीम हे स्वतंत्र राष्ट्र अलगदपणे भारतात विलीन करून घेतले,
ज्यांनी संस्थानिकांचे तनखे (Privi Purses) व विशेषाधिकार रद्द करून,
त्यांना सामान्य लोकांच्या रांगेत आणून ठेवले,
वाजपेयीनीं ज्यांचा "दुर्गा" असा उल्लेख केला,
मराठी पत्रकारांनी ज्यांना "याह्यासुर मर्दिनी" अशी उपाधी दिली.
त्या इंदिराजींची आज शंभरावी जयंती.
--------------------------------------------------------------
शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०१६
सध्याच्या भाजपचे प्रिय आणि तत्कालीन जनसंघाचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याबद्दल थोडंसं....
१) 21ऑगस्ट1936 ला कलकत्त्यात झालेल्या एका बैठकीत मोहम्मद अली जीना यांच्या उपस्थितीत, त्यांचं कौतुक करताना मुखर्जी म्हटले, "स्वतः निश्चित केलेल्या आदर्शवादी लक्ष्याला यशस्वीरीत्या साध्य करणारे एक राष्ट्रवादी नेते म्हणजे जीना आहेत."
२) १९३९ ला सावरकरांच्या बंगाल दौऱ्याचा मोठा प्रभाव मुखर्जींवर होता. 17 फेब्रुवारी,1939 ला त्यांच्या डायरी मध्ये त्यांनी लिहिलं, "वयाच्या 33व्या वर्षी कुलगुरुची जबाबदारी चालून आली. अनेक सन्मान न मागता मिळाले. पण जसजसे वय वाढत आहे, तसतसे आर्थिक जबाबदाऱ्या वाढत आहेत. मला नियमित भरपूर उत्पन्नाची गरज दिवसेंदिवस जाणवत आहे. माझी सेवा घेऊन त्याचा मोबदला द्यायला कुणी तयार असेल का? बंगाल सरकारमध्ये तर मला काही संधी दिसत नाही"...…..दोनच वर्षात श्यामाप्रसाद मुखर्जी हे मुस्लिम लीग आणि हिंदू महासभेच्या युती सरकारचे उपमुख्यमंत्री झाले.
३) १२ डिसेंबर, 1941ला, लाहोरच्या मुस्लिम लीग च्या अधिवेशनात "स्वतंत्र पाकिस्तान" चा ठराव मांडणाऱ्या फझलुल हक यांच्या बंगाल मंत्रिमंडळात हिंदू महासभेचे श्यामाप्रसाद मुखर्जी सामील झाले.
४) त्यांनी सुभाषचंद्र बोस आणि सरथचंद्र बोस यांनाही "हिंदू" या उद्दिष्टयासाठी लढावं असे आवाहन केले होते पण दोघांनीही ते स्पष्ट शब्दात नाकारले.
५) "चले जावं" आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी बंगालचे तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर सर जॉन हर्बर्ट यांना 26जुलै1942ला पत्रं लिहून स्वतःची पूर्ण निष्ठा अर्पित करत लिहिल कि काँग्रेस चे हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी कठोर पावले उचलावीत आणि त्यात ते स्वतः पूर्ण साथ देतील.
६) तरीही नेहेरूनी त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलं. तो नेहेरूनचा मोठेपणा होता. मुखर्जी केंद्रीय मंत्री असतानाच अ) ३१ डिसेंबर 1947ला काश्मीर समस्या UN मध्ये उचलण्याचा निर्णय सर्वसंमतीने मंत्रिमंडळात झाला ब) 13 ऑगस्ट 1948 आणि 5जानेवारी1949 ला केंद्रीय मंत्रिमंडळानी काश्मीर समस्येवर सार्वमत घेण्याचा निर्णय सर्वसंमतीने UN ला पाठवला क) 17ऑक्टोबर1949ला काश्मीरला आर्टिकल370 मंजूर करून विशेष दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्वसंमतीने घेतला......याची शेख अब्दुल्लानी त्यांना 4फेब्रुवारी,1953 ला आठवण करून दिली तेव्हा श्यामाप्रसाद मुखर्जीनचा चेहरा "कुठे लपवू" असा झाला होता.....
काश्मीरमध्ये तुरुंगात अटक असताना आजारी पडून त्यांचा मृत्यू झाला आणि अशा माणसाला हे संघी शहिद म्हणतात.....ढोंग....
संदर्भ:
*** Leaves from a Diary, S.P.Mukherjee, Oxford University Press, 1993
***Mookherjee papers, ii-iv instalment, file no.75/1945-46
***Bengal divided:Hindu communalism and secularist, Cambridge University, page 183
१) 21ऑगस्ट1936 ला कलकत्त्यात झालेल्या एका बैठकीत मोहम्मद अली जीना यांच्या उपस्थितीत, त्यांचं कौतुक करताना मुखर्जी म्हटले, "स्वतः निश्चित केलेल्या आदर्शवादी लक्ष्याला यशस्वीरीत्या साध्य करणारे एक राष्ट्रवादी नेते म्हणजे जीना आहेत."
२) १९३९ ला सावरकरांच्या बंगाल दौऱ्याचा मोठा प्रभाव मुखर्जींवर होता. 17 फेब्रुवारी,1939 ला त्यांच्या डायरी मध्ये त्यांनी लिहिलं, "वयाच्या 33व्या वर्षी कुलगुरुची जबाबदारी चालून आली. अनेक सन्मान न मागता मिळाले. पण जसजसे वय वाढत आहे, तसतसे आर्थिक जबाबदाऱ्या वाढत आहेत. मला नियमित भरपूर उत्पन्नाची गरज दिवसेंदिवस जाणवत आहे. माझी सेवा घेऊन त्याचा मोबदला द्यायला कुणी तयार असेल का? बंगाल सरकारमध्ये तर मला काही संधी दिसत नाही"...…..दोनच वर्षात श्यामाप्रसाद मुखर्जी हे मुस्लिम लीग आणि हिंदू महासभेच्या युती सरकारचे उपमुख्यमंत्री झाले.
३) १२ डिसेंबर, 1941ला, लाहोरच्या मुस्लिम लीग च्या अधिवेशनात "स्वतंत्र पाकिस्तान" चा ठराव मांडणाऱ्या फझलुल हक यांच्या बंगाल मंत्रिमंडळात हिंदू महासभेचे श्यामाप्रसाद मुखर्जी सामील झाले.
४) त्यांनी सुभाषचंद्र बोस आणि सरथचंद्र बोस यांनाही "हिंदू" या उद्दिष्टयासाठी लढावं असे आवाहन केले होते पण दोघांनीही ते स्पष्ट शब्दात नाकारले.
५) "चले जावं" आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी बंगालचे तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर सर जॉन हर्बर्ट यांना 26जुलै1942ला पत्रं लिहून स्वतःची पूर्ण निष्ठा अर्पित करत लिहिल कि काँग्रेस चे हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी कठोर पावले उचलावीत आणि त्यात ते स्वतः पूर्ण साथ देतील.
६) तरीही नेहेरूनी त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलं. तो नेहेरूनचा मोठेपणा होता. मुखर्जी केंद्रीय मंत्री असतानाच अ) ३१ डिसेंबर 1947ला काश्मीर समस्या UN मध्ये उचलण्याचा निर्णय सर्वसंमतीने मंत्रिमंडळात झाला ब) 13 ऑगस्ट 1948 आणि 5जानेवारी1949 ला केंद्रीय मंत्रिमंडळानी काश्मीर समस्येवर सार्वमत घेण्याचा निर्णय सर्वसंमतीने UN ला पाठवला क) 17ऑक्टोबर1949ला काश्मीरला आर्टिकल370 मंजूर करून विशेष दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्वसंमतीने घेतला......याची शेख अब्दुल्लानी त्यांना 4फेब्रुवारी,1953 ला आठवण करून दिली तेव्हा श्यामाप्रसाद मुखर्जीनचा चेहरा "कुठे लपवू" असा झाला होता.....
काश्मीरमध्ये तुरुंगात अटक असताना आजारी पडून त्यांचा मृत्यू झाला आणि अशा माणसाला हे संघी शहिद म्हणतात.....ढोंग....
संदर्भ:
*** Leaves from a Diary, S.P.Mukherjee, Oxford University Press, 1993
***Mookherjee papers, ii-iv instalment, file no.75/1945-46
***Bengal divided:Hindu communalism and secularist, Cambridge University, page 183
गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०१६
महाराष्ट्र गीत
बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा
गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवर जेथले तुरंगि जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे?
पौरुषासि अटक गमे जेथ दु:सहा
प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे
सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे
रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे
रमणीची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा गृहा
नग्न खड्ग करी उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले
भासत शतगुणित जरी असति एकले
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा
विक्रम वैराग्य एक जागि नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मया वहा
गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो
स्फूर्ति दीप्ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनि लेखनीहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनि वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा
गीत - श्रीपादकृष्ण कोल्हटकर
संगीत - शंकरराव व्यास
स्वर - जी. एन्. जोशी , ज्योत्स्ना भोळे
Courtesy - www.aathavanitali-gaani.com
बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा
गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवर जेथले तुरंगि जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे?
पौरुषासि अटक गमे जेथ दु:सहा
प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे
सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे
रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे
रमणीची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा गृहा
नग्न खड्ग करी उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले
भासत शतगुणित जरी असति एकले
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा
विक्रम वैराग्य एक जागि नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मया वहा
गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो
स्फूर्ति दीप्ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनि लेखनीहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनि वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा
गीत - श्रीपादकृष्ण कोल्हटकर
संगीत - शंकरराव व्यास
स्वर - जी. एन्. जोशी , ज्योत्स्ना भोळे
Courtesy - www.aathavanitali-gaani.com