या उजेडात थोडी आग असती तर कडब्याची गंजी लावण्याचेसुद्धा एक कौशल्य असते. खेडय़ातही सरसकट सगळ्यांनाच
ही लावता येते असे नाही. या कामासाठी काही माणसे असतात. कुठे या गंजी
आयताकृती असतात, तर कुठे गोलाकार. काही ठिकाणी या गोलाकार गंजीलाही घुमट
काढलेला असतो. यातला नेमकेपणा आणि तंत्र खास उठून दिसणारे. उन्हाळ्यात
शेणाच्या गोवऱ्या थोपून त्यांचे ढीग लावले जातात. गोलाकार गोवऱ्या
रचल्यानंतर त्या शेणाने िलपून घेतल्या जातात. यातही एक कौशल्य आहेच.
नागपंचमीच्या दिवशी मातीच्या भिंतीवर हुबेहूब काढले जाणारे नाग आणि त्यावर
दिले जाणारे काळे-पांढरे ठिपके, जिवंत वाटणाऱ्या या नागांच्या जिभा.
पोळ्याच्या दिवशी गोठय़ात आणि दरवाज्यावर काढली जाणारी चित्रे, टाकून
दिलेल्या काचेच्या रंगीबेरंगी बांगडय़ांतूनही भिंतीवर साकारली जाणारी
वेगवेगळी चित्रे. जुन्या काळी मातीच्या भिंतीवर पिसारा फुललेल्या मोरापासून
ते वेगवेगळ्या नक्षीदार झाडांपर्यंत अनेक चित्रे या बांगडय़ांमधून
साकारलेली दिसत. या किती तरी गोष्टी आधी मनात असतात आणि नंतर त्यांना आकार
प्राप्त होत जातात. आपण काही तरी कला जोपासतो आहोत असा अभिनिवेशही
त्यापाठीमागे नसतो किंवा असे करणारे आपण सर्वसामान्यांपेक्षा वेगळे आहोत,
अशी भावनाही या लोकांमध्ये नसते. रोजच्या जगण्यातच अनुभवांना असे अर्थपूर्ण
आकार देणारी माणसे आपल्यासोबत दुसऱ्यांचेही जगणे समृद्ध करत असतात. यात
कुठलाही बडेजाव नसतो, असते ती फक्तयांच्या जगण्यालाच चिकटून असलेली नसíगक
सहजता.(आसाराम लोमटे यांचा सविस्तर लेख आजच्या लोकसत्ता मध्ये)
शुक्रवार, २७ जून, २०१४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा