गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६

1) पाकव्याप्त काश्मीर म्हणजे पाकिस्तान  समजावे काय?

2) अशा कारवायांना लष्कर/सरकार प्रसिध्दी देत नसते हे पहिल्यांदाच घडले आहे.
लष्कराला प्रसिद्धीची हाव नसते म्हणतात.
मग ही हाव कुणlखातर?

3) भेकडांना (मनमोहनसिंग व अन्य यूपीएनेते) विश्वासात कशाला घेतले?

शनिवार, २४ सप्टेंबर, २०१६

थोरले साहेब 1962 साली केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून गेले तेंव्हा दुसरा मराठा मुख्यमंत्री होणार् नाही याची काळजी घेतली. नंतर तेरा वर्षे बिगर मराठा मुख्यमंत्री होता तो पुढे चालूही राहिला असता. पण मराठयांमधील एकमेव मर्द असलेल्या शालिनीताई पाटील यांनी, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठाच असला पाहिजे अशी तोफ डागल्यामुळे शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले.नंतर 1991 साली परत इतिहासाची पुनराव्रुत्ती झाली.धाकटे साहेब परत संरक्षण मंत्री म्हणूनच केंद्रात गेले ते दुसरा मराठा मुख्यमंत्री होणार् नाही याची काळजी घेऊनचं. मात्र दोन वर्षातच मुम्बई बॉम्बस्फोटाच्या निमित्त होऊन स्वतःच मुख्यमंत्री म्हणून परत आले. दुसऱ्या मराठयाला मुख्यमंत्री होऊ दिले नाही.आणि तरी म्हणे हे मराठ्यांचे नेते.

बुधवार, ७ सप्टेंबर, २०१६

कोण म्हणतो घराणेशाहीमुळे इंदिराजी पंतप्रधान झाल्या ?
जानेवारी १९६६ साली लाल बहादूर शास्त्री यांचे निधन झाल्यामुळे काँग्रेस खासदारांची सांसदीय पक्षाचा नेता निवडण्याकरिता बैठक झाली. ( सार्वत्रिक निवडणुकीनंतर सर्वच  पक्षांच्या खासदारांची अशी नेता निवडीकरिता बैठक होत असते.
बहुमतात असलेल्या पक्षाने निवडलेला नेता नंतर राष्ट्रपतींकडे पंतप्रधानपदाचा दावा करतो.)
या बैठकीत नेतेपदावर एकमत न होता इंदिराजी व काँग्रेसमधील एक ज्येष्ठ नेते यांनीसुद्धा नेतेपदावर दावा केला. कुणीच माघार घेत नसल्यामुळे मतदान घेण्यात आले.
काँग्रेस खासदारांनी बहुमताने इंदिराजींना सांसदीय पक्षाचा नेता निवडले.
(भारताच्या सांसदीय इतिहासात अशा प्रकारे सांसदीय पक्षाचा नेता निवडण्यासाठी होणारी ही पहिली व शेवटची निवडणूक आहे. बहुतेक सर्वच पक्ष एकमताने (?) आपला नेता निवडतात.)
त्यानंतर इंदिराजींनी रीतसर राष्ट्रपतींकडे आपला पंतप्रधानपदाचा आपला दावा सादर केला व त्या भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान झाल्या.
म्हणजेच इंदिराजीना वडिलांच्या पुण्याईने पंतप्रधानपद मिळाले नसून लोकशाही मार्गाने लढा देऊन त्यांनी पंतप्रधानपद  मिळवले आहे हे स्पष्ट होते.
पुढे त्यांनी आपल्या कर्तृत्वाने पक्षात आपली जागा बनविली व आपण गुंगी गुडिया नसून कणखर पोलादी महिला आहोत असे सिद्ध केले तो इतिहास सर्वांना माहितच आहे.