मंगळवार, ९ जून, २०१५

पाठींबा देणारयांचा  सत्कार. विजय मिळवणाऱ्यांचे काय ? बांगला देश युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवला. पाकिस्तानी कमांडर जनरल ए ए के नियाजी याने लेखी शरणागती पत्करली. ९३,,000 पाकिस्तानी सैनिक युध्दबंदी  म्हणून  भारतात आणल्या गेले. इंदिराजी या विजयाच्या शिल्पकार होत्या. स्वातंत्र्यानंतर चोवीस वर्षांतच पाकिस्तानची पुन्हा एकदा फाळणी झाली. वाजपेयींनी इंदिराजींना उस्फुर्तपणे   " दुर्गा " ही उपाधी दिली होती. लष्कर प्रमुख Sam माणेकशा यांना फिल्ड मार्शल हा सर्वोच्च लष्करी बहुमान दिल्या गेला. भारतीय सैन्याच्या इतिहासातील ते एकमेव फिल्ड मार्शल आहेत. तेंव्हा चित्रपटगृहाyतून पाकिस्तानच्या शरणागतीची चित्रफीत पाहतांना अंगावर रोमांच उठायचे. इतके असुनही या सर्व प्रकरणात भारतीय सैन्याने ज्या मार्दवतेने ही बाब हाताळली तेही कौतुकास्पद होते. हे सर्व आता आठवण्याचे कारण असे की नुकतीच अशी बातमी वाचली की बांगला देश स्वातंत्र्यलढ्याला ठाम पाठींबा दिल्याबद्दल वाजपेयींजीनचा ६ जून रोजी सत्कार होणार आहे. स्वत: वाजपेयीजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे जाऊ शकणार नाहीत. त्यांच्यावतीने मोदीजी हा सत्कार स्वीकारणार आहेत. खरे पाहता भारताप्रती  कृतज्नता म्हणून भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना या सत्कार समारंभाचे निमंत्रण असायला हवे होते. त्याऐवजी पाठींबा देणार्याचा सत्कार होतो आहे. हे म्हणजे सेंच्युरी मारणाऱ्या खेळाडूऐवजी स्टेडीयममधून टाळ्या पिटणाऱ्या प्रेक्षकाला पुरस्कार देण्यासारखे आहे. मोदी या कार्यक्रमात इदिरांजींचा एका शब्दानेही उल्लेख करणार नाहीत हे निश्चित. मागील वर्षी इंदिराजींच्या जयंतीच्या दिवशी त्यांनी त्यानी आपण भारतात असणार नाही याची काळजी घेतली होती. आता ६ जूनला काय काय करतात ते  या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: