थोरले साहेब 1962 साली केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून गेले तेंव्हा दुसरा मराठा मुख्यमंत्री होणार् नाही याची काळजी घेतली. नंतर तेरा वर्षे बिगर मराठा मुख्यमंत्री होता तो पुढे चालूही राहिला असता. पण मराठयांमधील एकमेव मर्द असलेल्या शालिनीताई पाटील यांनी, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठाच असला पाहिजे अशी तोफ डागल्यामुळे शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले.नंतर 1991 साली परत इतिहासाची पुनराव्रुत्ती झाली.धाकटे साहेब परत संरक्षण मंत्री म्हणूनच केंद्रात गेले ते दुसरा मराठा मुख्यमंत्री होणार् नाही याची काळजी घेऊनचं. मात्र दोन वर्षातच मुम्बई बॉम्बस्फोटाच्या निमित्त होऊन स्वतःच मुख्यमंत्री म्हणून परत आले. दुसऱ्या मराठयाला मुख्यमंत्री होऊ दिले नाही.आणि तरी म्हणे हे मराठ्यांचे नेते.
शनिवार, २४ सप्टेंबर, २०१६
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा