सोमवार, २३ डिसेंबर, २०१३

   अरविंद केजडीवाल आणि  झेड सुरक्षा…… 

अरविंद केजडीवाल यांनी झेड सुरक्षा नाकारली अशी बातमी आलेली आहे.   आज जरी त्यांनी झेड सुरक्षा नाकारली असली तरी त्यांनी जनतेच्या अपेक्षा एवढ्या  वाढवून  ठेवल्या आहेत कि त्या मागण्यांची तड लावण्यासाठी त्यांना जनतेचा गराडा पडल्याशिवाय राहणार नाही व  दैनंदिन कामे सुरळीतपणे पार पाडावी म्हणून ही गर्दी दूर ठेवण्याची काहीतरी उपाय योजना त्यांना करावीच लागेल. झेड सुरक्षा नाही तर किमान पक्ष स्वयंसेवकांची सुरक्षा फळी तरी स्वत:भोवती उभारावी लागेल. शिवाय "आप " सरकार सत्तेवर आल्यावर जे कही शासन निर्णय घेईल ते बहुतांश जनतेला आवडणारे जरी असले तरी त्यामुळे काहींचे हितसंबंध नक्कीच दुखावले जातील व हि दुखावली जाणारी मंडळी कुठल्यही थराला जाऊ शकतील व त्यांच्यापासून संरक्षण म्हणून केजडीवाल यांना सुरक्षा म्हणून काहीतरी उपाय योजना करावी लागेल. पक्षस्वयंसेवक जनतेला मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचू देत नाहीत अशीही तक्रार पुढे येईल. नोकरशाही  " व्यवस्था " ही त्यांनी सुरक्षा घेणे किती आवश्यक आहे व त्यामुळे त्यांच्या कार्यकुशलता व कार्यक्षमतेत भरीव वाढ होईल व ते जनतेची ज्यास्त चांगली सेवा करू शकतील हे त्यांच्या बरोबर गळी  उतरवतील . जनतेला शासनकर्त्यांपासून कसे दूर ठेवावे याबाबतीत नोकरशाही वाकबगार आहे हे आता जगजाहीर आहे. 
 १९७७ साली सत्तेवर आलेल्या " जनता " सरकारातील काही मंत्र्यांनी सायकलवरून कार्यालयात जाण्याची घोषणा केली होति. ती फक्त चारच दिवस टिकली. एकदा दरबारात नेमणूक झालीकी " दरबारी " पद्धतीनेच वागावे लगते.केजडीवाल यांची भिष्मप्रतिज्ञा किती दिवस टिकते ते पाहूया ?

राजेंद्र कडू
२३ डिसेंबर २०१३


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: