बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१९

भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी चीनसारखे कडक कायदे हवेत म्हणणाऱ्यांसाठी एक सूचना.
कडक कायदे किंवा कडक हुकूमशहा हवा, हे सगळ तत्वज्ञान दुसर्‍यांसाठी आहे. आम्हाला कडक कायदे हवे आहेत ते इतरांना शिस्त लावण्यासाठी. मी किंवा माझ्या एखादा नातेवाईकाने कायदा तोडला तर आमचे ऑर्ग्युमेंट वेगळे असते. तो गुन्हा कडक शिक्षा करण्याइतका गंभीर नसतो. आमचे अनेक नातेवाईक भ्रष्टाचारी आहेत. त्यांना शिक्षा व्हावी असे आम्ही उघड बोलून दाखवत नाही कारण आम्हाला नातेवाईकांशी संबंध खराब करून घ्यायचे नाहीत. आमच्या नातेवाईकांना ते करत असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल जाब न विचारणे म्हणजे त्यांच्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणे होय. आमची ईच्छा अशीच असते की कुणितरी कडक हुकुमशहा यावा व त्याने भ्रष्टाचारयांना जबर शिक्षा करावी. आम्हाला पाहूण्याच्या हातून साप मारून घ्यायचा आहे. चीनच्या प्रेमात पडण्यापूर्वी चीनमधील सामाजिक/राजकीय परिस्थितीबद्दल संपूर्ण माहिती घ्यावी हे ठीक राहील.

शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०१९

जुगारात मनासारखे दान पडले तर ती आपली हुशारी नाही ,
सुदैव असते महाआघाडी

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१९

 ज्यांना माहित नसेल त्यांच्याकरीता......
आजचा महानायक आपल्या पहिल्या चित्रपटात १/७ (एक सप्तमांश) नायक होता म्हणजे सात नायकांपैकी (६पुरुष व एक महिला) एक नायक होता. अन्य नायकांमध्ये जलाल आगा व उत्पल दत्त हे पण होते. हा चित्रपट गोवा मुक्ती संग्रामावर आधारित होता, दिगदर्शक होते के ए अब्बास

शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०१९

एव्हढे सारे अनर्थ केवळ अतिरेकी राष्ट्रवादामुळे ओढवले,
हिटलरने लोकांना भुरळ पाडली होती. तो प्रचंड बहुमताने निवडून आला होता. तो स्वतःला आर्य वंशाचा म्हणवून घ्यायचा. त्याच्या पक्षाचे चिन्ह स्वस्तिक होते. त्याने शेजारील देश ताब्यात घेणे सुरु केले. पण काही दिवसांतचं दोस्त राष्ट्रांच्या सैन्याने जर्मन सैन्याचा पराभव केला. हिटलरने आत्महत्या केली. हिटलरच्या पराभूत जर्मनीचे विजेत्या दोस्त राष्ट्रांनी दोन तुकडे केले. बर्लीन शहराचे पण दोन तुकडे केले. अर्ध्या बर्लीनभोवती, की जे पश्चिम जर्मनीला द्यायचे होते (पण जे पूर्व जर्मनीच्या हद्दीत होते), कॉंक्रीटची भिंत बांधूनत्यावर काटेरी तार लावण्यात आली. वॉच टॉवर उभारण्यात आले. संगीनधारी सैनिक डोळ्यात तेल घालून पहारा देऊ लागले.
एकाच शहरांत राहाणाऱ्यांना इकडून तिकडे जायला पासपोर्ट/व्हिसा लागू लागला. हे सर्व १९९१ पर्यंत सुरु होते. एव्हढे अनर्थ एका अतिरेकी राष्ट्रीवाद्यामुळे झाले.
--------------------------------------------------