राजकारणातील खिलाडूपणाचे आतापर्यंत माझ्या पाहणीत पुढीलप्रमाणे उल्लेखनीय असे चार प्रसंग झाले आहेत. १) राजकीय शत्रू असून सुद्धा नितीशकुमार यांनी मोदींच्या पाकिस्तानच्या 'स्पायडरम्यान' दौऱ्याची केलेली भलामण. २) मोदींनी स्व. सुनंदा थरूर यांचा "पचास कोटीकी गर्ल फ्रेंड' असा अत्यंत असभ्य भाषेत केलेला उल्लेख दुर्लक्षून स्व. सुनंदा यांनी मोदींच्या काश्मीर धोरणाला दिलेला पाठींबा (की जेंव्हा त्यांचे पती युपीए सरकारात मंत्री होते व मोदी विरोधी पक्षात ). ३) बांगला युद्धातील विजयानंतर तेंव्हाचे विरोधी पक्ष नेता अटल बिहारी वाजपेयी यांनी उस्फुर्तपणे इंदिराजींना दिलेली "दुर्गा' ही उपाधी (कारण या युद्धामुळे पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते व पाकिस्तानच्या ९३,००० त्र्याण्णव हजार सैनिकांना युद्धबंदी म्हणून ताब्यात घेऊन भारतात आणले गेले होते. हा एक जागतिक विक्रम आहे. शिवाय पाकिस्तानला लेखी शरणागती पत्करावी लागली होती त्यामुळे पाकिस्तानचे पुरते नाक ठेचल्या गेले होते. ४) नरसिंहराव पंतप्रधान असतांना त्यांनी युनोच्या बैठकीसाठी जे भारतीय प्रतिनिधी मंडळ पाठविले होते त्याचे नेतृत्व कुठल्याही मंत्र्याकडे किंवा कॉंग्रेसच्या नेत्याकडे न देता तेंव्हाचे विरोधी पक्ष नेते अटल बिहारी वाजपेयी यांचेकडे दिले होते. खुद्द वाजपेयींनी यांनी ते पंतप्रधान झाल्यावर नरसिंहराव यांच्या या खिलाडूपणाचे संसदेत कौतुक केले होते व रावांच्या खेळीमुळे संपूर्ण जग आणि पाकिस्तान चकित झाला होता असे सांगितले होते. आणि मोदी मात्र तांत्रिक कारणावरून कॉंग्रेसला विरोधी पक्ष पदाचा दर्जा द्यायला तयार नाहीत.
शुक्रवार, १५ जानेवारी, २०१६
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा