सोमवार, १८ जानेवारी, २०१६

 

कोण म्हणतो …, पोलादी महिलेची आणखी एक यशस्वी खेळी. ………

मोदी सध्या सिक्कीमच्या दौऱ्यावर आहेत. थांबा असे चमकू नका. सिक्कीम भारतातच आहे. मोदींचा हा दौरा परदेश दौरा ठरला असता परंतु त्यांना हा आनंद न मिळू देण्याला इंदिरा गांधीच कारणीभूत आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा ब्रिटीश अमलाखाली असलेल्या सिक्किमने स्वतंत्र राहायचे ठरविले मात्र नेहरूंच्या शिष्टाईमुळे १९५० साली दोन्ही देशांमध्ये करार होऊन सिक्किमने आपले संरक्षण व परराष्ट्र धोरण सांभाळायची जबाबदारी मोठ्या विश्वासाने भारताकडे दिली. सिक्कीममध्ये संसद स्थापन झाली.  मात्र चोग्याल (सिक्कीमचे राजे) हेच प्रभावी सत्ताधारी होते. मात्र १९७३ साल उजाडेपर्यंत लोकमत चोग्यालच्या विरोधात गेले व तेथील पंतप्रधानांनी १९७५ साली आम्हाला ला भारतात सामील करून घ्या अशी भारतीय संसदेला विनंती केली. विनंती केली. इंदिराजींनी लगेच सिक्कीममध्ये आपले सैन्य पाठवून चोग्यालच्या राजवाड्यातील सैनिकांना नि:शस्त्र केले. नंतर घेतल्या गेलेल्या सार्वमतात सिक्कीमच्या ९७. ५ टक्के जनतेने चोग्यालच्या राजवटीविरुद्ध मतदान केले. पुढे भारतीय संसदेने ठराव पारित करून सिक्किमचे भारतात रीतसर विलिनीकरण करून घेतले व सिक्कीम भारताचे २२ वे घटकराज्य बनले. तेंव्हा शेजारील काही देशांनी (ज्यांचा सिक्कीमवर डोळा होता) यागोष्टीला भारताची  विस्तारवादी महत्वाकांक्षा म्हणून कांगावा केला होता.  मात्र इंदिराजींनी त्याला धूप घातली नाही. काश्मिरचे तेंव्हाचे राजे हरिसिंग यांनी १९४७ साली तत्परेतेने भारतात सामील होण्याबद्दल पत्र दिले असते तर काश्मीर प्रश्न चिघळला नसता व जवळजवळ अर्धे काश्मीर पाकिस्तानच्या घश्यात गेले नसते. राजा हरीसिंगांना काश्मीर स्वायत्त ठेवायचे होते पण जेंव्हा घुसखोर उंबरठ्यापर्यंत आले तेंव्हाच त्यांना भारतात सामील व्हायची उपरती झाली. सिक्कीम स्वतंत्र देश असता तर मोदिजींचा हा आणखी एक परदेश दौरा ठरला असता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: