ज्या प्रमाणे सर्वच प्रादेशिक भाषा ह्या राष्ट्रभाषा आहेत त्याचप्रमाणे मराठीच्या सर्व बोलीभाषा ह्या मराठीच आहेत. मराठीत बोला तर खर. मराठी माझी माय, तर इतर सर्व भाषा मावश्या आहेत. पण मी मात्र माय मरो पण मावशी जगो असे म्हणणार नाही. माय जगो आणि मावश्याही जगो असे माझे धोरण आहे. इथे मात्र मावशी आईच्या गळ्याला नख लावतांना दिसत आहे. 'हिंदीमे बोलो' अशी ताकीद वजा सूचना केल्या जातात. महाराष्ट्रात मी मराठीच बोलणार. राष्ट्रभाषा जर हिंदी ठरली तर तिचे काम मला परप्रांतात गेल्यावरच पडायला हवे. देशाची राष्ट्रभाषा मराठी असावी असा माझा प्रयत्न राहिल. कारण एकेकाळी मराठ्यांची सत्ता संपूर्ण भारतभर होती. मोगलांचीही होती पण त्यांची भाषा फारसी होती. उर्दू ही फार अलीकडची भाषा आहे ईंग्रज भारतात आल्यावर उर्दू भाषा तयार झाली ती मुसलमानांची भाष नव्हे. तामिळ,कन्नड भाषांना अभिजात भाषांचा दर्जा मिळालेला आहे. मराठीही त्या रांगेत सर्वात पुढे आहे.
शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०१५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा