शुक्रवार, ५ सप्टेंबर, २०१४

केंद्रीय मंत्रिमंडळ की केंद्रीय मांडलिक मंडळ ?
परराष्ट्र मंत्र्यांशिवाय परराष्ट्र दौरा  ! वाचा
" जापान दौऱ्यातील दुसरी कमतरता ही राजनैतिक आहे आणि तिचा परिणाम देशांतर्गत मर्यादित आहे. ती म्हणजे भारतासाठी इतक्या महत्त्वाच्या दौऱ्यात आपल्या परराष्ट्रमंत्र्याचा नसलेला सहभाग. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या दौऱ्यात नाहीत. त्याचे कारण म्हणजे त्यांना पंतप्रधान मोदी यांचे आमंत्रण नव्हते. मोदी आणि भाजप यांतील अन्य ज्येष्ठ यांच्यातील अदृश्य संघर्षांचा हा दृश्य परिपाक म्हणावा लागेल. राजनैतिक नियम नाही, परंतु संकेतानुसार आंतरराष्ट्रीय भेटीगाठींत परराष्ट्रमंत्री हा पंतप्रधानांच्या समवेत असतो. त्याचा अकारण भंग मोदी यांच्याकडून सकारण घडला असून तो टळला असता तर बरे झाले असते. भाजपची केंद्रातील सत्ता ही मोदी यांनी आपल्या एकटय़ाच्या बळावर खेचून आणली हे जरी सत्य असले तरी ती राबवणे त्यांना एकटय़ाला शक्य नाही. सत्ता आणणे आणि ती राबवणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. गुजरातेत एकहाती कारभार करणे जमले म्हणून केंद्रातही त्याच मार्गाचा आग्रह धरणे मोदी यांना आणि देशालाही परवडणारे नाही. अशा वेळी परराष्ट्रमंत्री स्वराज यांना त्यांनी जपान दौऱ्यात सहभागी करून घेतले असते तर औचित्यभंगाचा ठपका टळला असता. असो. " (लोकसत्ता)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: