चला, शिकू या...
श्रीकांत पक्का स्वयंसेवक.. त्याचे विचार फार पक्के होते. आणि धार्मिक, सामाजिक धारणा पक्क्या...मी अगदी पक्क्या विचारांच्या मित्रांशी संवाद साधताना जरा जपून बोलतो..मैत्री तुटणे परवडत नाही...त्यापेक्षा माघार घेत गप्प बसलेले बरे...
" लिमये, तुमच्याशी जरा बोलायाचे आहे...मला तुमची उझबेकीस्तानात फार आठवण झाली."
मी चपापून सावध झालो..चार महिन्यापूर्वी झालेला वाद जसाच्या तसा आठवला...विषय --अयोध्या राममंदिर उध्वस्त करण्याच्या कारस्थानाचा होता...
" अरे वा... उझबेकीस्तानातील वस्तू फार जुन्या आहेत..सुंदर आहेत..जुना वारसा त्यांनी कटाक्षाने जपला आहे.. तू कायकाय पाहिलेस ? फोटो दाखव ना..." मी चर्चेसाठी वेगळा विषय काढला..वाद नको..
श्रीकांतने माझा हात हातात घेतला आणि प्रेमाने दाबला..
" लिमये, मला तुमच्याशी खूप बोलायचेय... आत्ता घरी चला..." त्याच्या आवाजात वेगळा मुक्त ,सरळ, चिंतनशील भाव होता. नजरेत निखळ प्रेम..
त्याच्या घरी गेलो. चहा झाला..
" मीच तुमच्या घरी येण्याचा विचार करत होतो..
मी गेले काही महिने परदेशी होतो..कंपनीने कामासाठी पाठवले होते.
मी तिथे अनेक अनुभव घेतले.नवीन माहिती मिळाली..बांधकाम क्षेत्रात प्रचंड झेप घेतलीय त्या लोकांनी..त्याच काय, सगळ्या देशाने ठरवले आहे प्रगतीचा रस्ता घरायचा.."
मग अनेक तपशील तो उत्साहानं सांगत राहिला..तिथले लोक, व्यापार, त्यांची गावे, वाड्यावस्त्या..
लोकजीवन...रीती, रिवाज... मी त्याला फक्त बोलतं करत होतो..
मग एका टप्प्यावर तो थांबला जरा वेळ..
" लिमये, तुमची आठवण कुठे झाली ते सांगतो...माझा सहकारी इंजिनीअर होता मुस्लीम. उंच, सडपातळ ,गोरापान..आमची तोंडओळख झाली. मैत्री वाढत गेली...एका शुक्रवारी सकाळी चहाच्या सुट्टीत मी सहज त्याला विचारले, नमाज पढायला तुम्ही कोणत्या मशिदीत जाता..? त्यानं विषय बदलला..गप्पा चालूच राहिला...संध्याकाळी घरी जाण्याआधी मला दुसऱ्या दिवशी घरी जेवायला येण्याचे आमंत्रण दिले..
दुसऱ्या दिवशी मी गेलो..त्याने स्वागत केले..घर स्वछ्.नीटनेटके... भिंती मोकळ्याढाकळ्या.भिंतींवर एकही फोटो नाही...स्वागताची कॉफी झाली. जेवायला अवकाश होता..मित्र म्हणाला,,,काल विचारलेल्या तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो..आमच्या देशात सार्वजनिक ठिकाणी , ऑफिसात... खाजगी गोष्टी आणि धार्मिक बाबींवर चर्चा होत नाही...धर्म, श्रद्धा, घराच्या आत... वायफट गप्पा कामाच्या ठिकाणी नाहीत...आम्ही नवीन देश घडवतो आहोत.. अनेक पिढ्या मागास राहिल्याने आमचा फार तोटा झाला..आता जगाबरोबर पुढे जायचे आहे...गेली तीसचाळीस वर्षे प्रगती करताना आम्ही नव्या विचारांचा काटेकोर अंमल करतोय..आमच्या घरांच्या भिंतींवर तुम्हाला आयते लटकवलेले दिसणार नाहीत. रस्त्यांवर नमाज पडणारे लोक दिसणार नाहीत.. धार्मिक मिरवणुका काढलेल्या दिसणार नाहीत...
आम्ही तुम्हाला कमी लेखतो...हा आरोप आम्हाला मान्य आहे..पण कारण जाणून घ्या...
तुम्ही--म्हणजे तुम्ही तीन देश.. पाकिस्तान, हिंदुस्तान आणि बांगलादेश..तुम्ही एकत्र बसून कधी आपसातील अडचणी सोडवत नाही..तुम्ही पिढ्यानपिढ्या अडाणी राहिलात... हेका न सोडता एकमेकांत भांडत राहिलात खाजगीत बोलताना तुमची संभावना मागास अशी होते.. शक्यतो या तीन देशांतील लोक कामगार म्हणून आमच्याकडे घेतले जात नाहीत..अंगमेहनतीला .मजूर म्हणून ठीक आहेत...
नुसत्या परंपरेचे आणि संस्कृतीचे गोडवे गाऊन प्रगती नाही होत...नवनिर्माण करायला लागते ती इर्षा आणि धडाडी.."
श्रीकांत कितीतरी सागत राहिला..
मधेच त्याच्या संगिनीने घोटघोट चहा पाजला.
"लिमये, माझ्या मनात तुमच्याविषयी थोडा गैरसमज होता...तुम्ही एकटेच माझ्या विचारांवर हल्ला करणारे भेटलात..मला उझ्बेकीस्तानाने नवा विचार दिला...'"
--------
गेल्या आठवड्यात श्रीकांत पुन्हा भेटला.. टिळक विद्यापीठात तो इन्डोलॉजी शिकतोय..
भारतीय जमिनीवर शिल्लक असलेल्या अवशेषांच्या अभ्यासाने जर त्याला उमगले की अवशेष इतिहास सांगतात.आणि आजची कर्तबगारी उद्याच्या पिढ्यांसाठी इतिहासाच्या अभ्यासासाठी लागणारी संपन्नता, सुबत्ता, स्थैर्य...हे सगळे सगळे मिळवून देते...तर वाहव्वा..
------------------ दिलीप लिमये / ०९/०९/१४ ( फेसबुकवरून)
" मीच तुमच्या घरी येण्याचा विचार करत होतो..
मी गेले काही महिने परदेशी होतो..कंपनीने कामासाठी पाठवले होते.
मी तिथे अनेक अनुभव घेतले.नवीन माहिती मिळाली..बांधकाम क्षेत्रात प्रचंड झेप घेतलीय त्या लोकांनी..त्याच काय, सगळ्या देशाने ठरवले आहे प्रगतीचा रस्ता घरायचा.."
मग अनेक तपशील तो उत्साहानं सांगत राहिला..तिथले लोक, व्यापार, त्यांची गावे, वाड्यावस्त्या..
लोकजीवन...रीती, रिवाज... मी त्याला फक्त बोलतं करत होतो..
मग एका टप्प्यावर तो थांबला जरा वेळ..
" लिमये, तुमची आठवण कुठे झाली ते सांगतो...माझा सहकारी इंजिनीअर होता मुस्लीम. उंच, सडपातळ ,गोरापान..आमची तोंडओळख झाली. मैत्री वाढत गेली...एका शुक्रवारी सकाळी चहाच्या सुट्टीत मी सहज त्याला विचारले, नमाज पढायला तुम्ही कोणत्या मशिदीत जाता..? त्यानं विषय बदलला..गप्पा चालूच राहिला...संध्याकाळी घरी जाण्याआधी मला दुसऱ्या दिवशी घरी जेवायला येण्याचे आमंत्रण दिले..
दुसऱ्या दिवशी मी गेलो..त्याने स्वागत केले..घर स्वछ्.नीटनेटके... भिंती मोकळ्याढाकळ्या.भिंतींवर एकही फोटो नाही...स्वागताची कॉफी झाली. जेवायला अवकाश होता..मित्र म्हणाला,,,काल विचारलेल्या तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो..आमच्या देशात सार्वजनिक ठिकाणी , ऑफिसात... खाजगी गोष्टी आणि धार्मिक बाबींवर चर्चा होत नाही...धर्म, श्रद्धा, घराच्या आत... वायफट गप्पा कामाच्या ठिकाणी नाहीत...आम्ही नवीन देश घडवतो आहोत.. अनेक पिढ्या मागास राहिल्याने आमचा फार तोटा झाला..आता जगाबरोबर पुढे जायचे आहे...गेली तीसचाळीस वर्षे प्रगती करताना आम्ही नव्या विचारांचा काटेकोर अंमल करतोय..आमच्या घरांच्या भिंतींवर तुम्हाला आयते लटकवलेले दिसणार नाहीत. रस्त्यांवर नमाज पडणारे लोक दिसणार नाहीत.. धार्मिक मिरवणुका काढलेल्या दिसणार नाहीत...
आम्ही तुम्हाला कमी लेखतो...हा आरोप आम्हाला मान्य आहे..पण कारण जाणून घ्या...
तुम्ही--म्हणजे तुम्ही तीन देश.. पाकिस्तान, हिंदुस्तान आणि बांगलादेश..तुम्ही एकत्र बसून कधी आपसातील अडचणी सोडवत नाही..तुम्ही पिढ्यानपिढ्या अडाणी राहिलात... हेका न सोडता एकमेकांत भांडत राहिलात खाजगीत बोलताना तुमची संभावना मागास अशी होते.. शक्यतो या तीन देशांतील लोक कामगार म्हणून आमच्याकडे घेतले जात नाहीत..अंगमेहनतीला .मजूर म्हणून ठीक आहेत...
नुसत्या परंपरेचे आणि संस्कृतीचे गोडवे गाऊन प्रगती नाही होत...नवनिर्माण करायला लागते ती इर्षा आणि धडाडी.."
श्रीकांत कितीतरी सागत राहिला..
मधेच त्याच्या संगिनीने घोटघोट चहा पाजला.
"लिमये, माझ्या मनात तुमच्याविषयी थोडा गैरसमज होता...तुम्ही एकटेच माझ्या विचारांवर हल्ला करणारे भेटलात..मला उझ्बेकीस्तानाने नवा विचार दिला...'"
--------
गेल्या आठवड्यात श्रीकांत पुन्हा भेटला.. टिळक विद्यापीठात तो इन्डोलॉजी शिकतोय..
भारतीय जमिनीवर शिल्लक असलेल्या अवशेषांच्या अभ्यासाने जर त्याला उमगले की अवशेष इतिहास सांगतात.आणि आजची कर्तबगारी उद्याच्या पिढ्यांसाठी इतिहासाच्या अभ्यासासाठी लागणारी संपन्नता, सुबत्ता, स्थैर्य...हे सगळे सगळे मिळवून देते...तर वाहव्वा..
------------------ दिलीप लिमये / ०९/०९/१४ ( फेसबुकवरून)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा