१९७१ साली इतके ( सुमारे एक लाख युध्दबंदी सांभाळणे सोपे नव्हते. जास्त ताणण्यातअर्थ नव्हता. पाकिस्तानी जनतेच्या खूप सदिच्छा भारत सरकारने मिळवल्या. त्यासाठी ऑल इंडिया रेडीओवरून हम खैरतसे हैं ( आम्ही सुखरूप आहोत ) हा युध्दबंद्यांचे मनोगत व्यक्त करणारा कार्यक्रम दररोज प्रसारित व्हायचा. वस्तुस्थिती अशी होतीकी आपण पाकिस्तानच्या अंतर्गत बाबीत ढवळाढवळ केली होती. परंतु लाखो बांगला निर्वासित दीर्घ मुदतीसाठी पोसण्याला पर्याय म्हणून आपण युद्धाचा पर्याय निवडला होता. यामुळे पाकिस्तानला धडा शिकवल्या गेला. त्यानंतर वर्षे पाकिस्तान चूप बसला याला आपली कमाई समजली पाहिजे. यापुढे समोरासमोरच्या लढाईत आपण भारताशी जिंकू शकत नाही याची शत्रूने खुणगाठ बांधली व छुपे युध्द सुरु केले. कारगिल आपण टाळू शकलो असतो पण वाजपेयी सरकारच्या काळात लष्करी गुप्तचर यंत्रणा सक्षम नव्हती असे तज्ञ म्हनतात. य़ुध्हात तह करतांना शत्रूवर जास्त जाचक अटी लादल्या तर नंतर, झालेल्या मानखंडनेचा बदला घेण्याची प्रवूत्ती शत्रुमध्ये बळावते. पैल्या महायुद्धात जर्मनीवर जाचक अटी लादल्या गेल्या व त्याचेच भांडवल करून हिटलरने दुसरे महायुध्द जगावर लादले. अतिरेकी राष्ट्रवादामुळे दोन्ही महायुद्धे झाली असा दहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात धडा आहे तो माझ्या नुकताच वाचण्यात आला. भारतातही गेली एक दीड वर्षापासून अतिरेकी राष्ट्रवादाची पेरणी सुरु आहे. पाकिस्तान सरकार, लष्कर व मुलतत्ववादी भारताचे शत्रू आहेत. मात्र आपण पाकिस्तानी जनतेलाही आपले शत्रू समजतो. जेंव्हा पाकिस्तानात विश्वचषक क्रिकेट सामने होते तेंव्हा भारतातून गेलेल्या मंडळीकडून हॉटेल चालकांनी जेवणाचे तर taxi चालकांनी प्रवासाचे पैसे घेतले नाहीत. " आप हमारे मेहमान हैं, आपसे पैसे कैसे ले सकते हैं " असे म्हणून सदभावना व्यक्त केली.
बुधवार, १७ डिसेंबर, २०१४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा